शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

यंदाच्या हंगामाकरिता पीककर्जाचे दर जाहीर

By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST

जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

२१४५ कोटींचे लक्ष्य : तांत्रिक गट समितीने मंजूर केले दर अमरावती : जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षासाठी ३६ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकरी खातेदारांना खरीप-रबी असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटप करण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात पीककर्ज वाटपासाठी जिल्हा तांत्रिक गटसमितीने पीककर्जाचे दर मंजूर केले आहेत. मंजूर केलेल्या दरात संकरीत ज्वारीसाठी किमान २२ हजार ते किमान २४ हजार, करडईसाठी १३ हजार ते १४ हजार, धानपिकासाठी ३८ हजार ते ४४ हजार गवती पिके (लेसर्न, बर्सीन) २२ ते २४ हजार , कांदा व भाजीपाला (सेट नेटसह) ५० ते ५५ हजार, कांदा व भाजीपाला पिकासाठी ४४ ते ५५ हजार, इतर भाजीपाल्यासाठी २७ ते ३३ हजार, भुईमूग खरीप २८ ते ३० हजार, भुईमूग रबी ३६ ते ३८ हजार, एरंडी ११ ते १३ हजार, मिरची बागायती ६२ ते ६४ हजार, पपई ४२ ते ४५ हजार, बटाटा -रताळे ६० ते ६६ हजार, संत्रा-मोसंबी प्रति झाड ३१० ते ३२०, डाळींब ७५ ते ८५ हजार, लिंंबू ६० ते ६२ हजार, केळी साधारण ८५ ते ८८ हजार, केळी टिश्युक्लचर ९० ते १ लाख १५ हजार, ऊस ७७ ते ८८ हजार, ऊस पूर्वहंगामी ७७ ते ९० हजार, ऊस खोडवा ६६ ते ७५ हजार, हळद ८० ते ८८ हजार, अदरक ८० ते ८८ हजार, आंबा ५५ ते ६० हजार, चिकू, पेरु ५५ ते ५२ हजार, सीताफळ ४५ ते ४९ हजार, आवळा, बोर ३५ ते ३८ हजार, पानपिंपळी ७० ते ८५ हजार व फूल शेतीसाठी किमान ६० हजार ते कमाल ८५ हजार असे जिल्हा तांत्रिक समितीने शिफारस केलेले दर आहेत. त्यानुसार यंदाच्या हंगामात खरीप व रबी पिकांना कर्जवाटप होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित बँकांकडे पीककर्जाची मागणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)