शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

By admin | Updated: January 22, 2015 00:04 IST

ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत...

सुरेश सवळे  चांदूरबाजारज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत हद्दीतील बहिरम येथे धार्मिकस्थळी घाणीच्या साम्राज्यात आपल्या अस्तित्वावर अश्रू ढाळीत आहे. याच पुतळ्यासमोर ढाबा उभारण्यास परवानगी देण्यात असून तेथे रोज बकऱ्यांची कत्तल केली जाते. इतकेच नव्हे तर शेजारी असलेल्या ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीतील दूषित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र या गंभीर बाबींकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही, ही शोकांतिका आहे. अख्या विदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील ऐन हिवाळ्याच्या मोसमात भरणारी बहिरम यात्रा हंडी, ब्रॅन्डी व तमाशासाठी ओळखली जात होती. येथे दररोज शेकडो बोकडांची कत्तल केली जाते. तमाशा या यात्रेचा केंद्रबिंदू होता. तमाशगीर महिलांव्दारे त्याकाळी २६ जानेवारीला होणारे झेंडावंदन वर्तमानपत्रावर पहिल्या पानावर झळाकायचे. गाडगेबाबांनी येथे समाजप्रबोधनाचे कीर्तन करुन येथील प्राण्यांच्या बळीला पायबंद घातला. त्यांचा आदर्श जागृत करण्यासाठी सन १९७१ मध्ये अमरावतीच्या तत्कालीन अनंत कॅम्पचे संचालक अजाबराव ठाकरे यांनी बहिरम यात्रेतील भगवान बाबा संस्थानच्या समोरील जागेत गाडगेबाबांचा पुतळा बसविला. याच परिसरातील १९७२ मध्ये पुंडलीकराव घोम यांनी दत्ताचे मंदिर बांधले. मूर्तीचे हात तुटल्यामुळे २००९ मध्ये परतवाड्याचे नगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी दत्ताची नवीन मूर्ती बसविली. शिरजगाव कसबा येथील रामचंद्र वांगे यांनी त्यावेळी स्वत:च्या मालकीचे पाच एकर शेत विकून आलेल्या पैशातून दत्त मंदिरासमोर भाविकांना बसण्याकरिता टिनशेड व सभागृह बांधले. आज त्या टिनशेडचा केवळ सापळा तेवढा शिल्लक आहे.एवढी वर्षे आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या धार्मिकस्थळी शाकाहारी व मांसाहारी ढाब्याची परवानगी देण्यात आली. या ढाब्यासाठी नाहरकरत प्रमाणपत्र देताना सदर जागा यात्रेकरू व बाजारासाठी राखीव असल्याने ढाब्यासाठी परवानगी देता येत नाही, असा शेरा तत्कालीन कारंजा (बहिरम) ग्रामपंचायतीच्या सचिवाने दिल्यानंतरही तत्कालीन सरपंचाने ढाबा उभारण्यासाठी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी परवानगी दिल्याची माहिती बहिरम संस्थानचे सुरेंद्र पाटील यांनी दिली. या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ३० नोव्हेंबर २०११ रोजीपर्यंत होती. त्यामुळे मुदत संपल्याची नाटीस ग्रामपंचायतीव्दारे संबंधित मालकांना देण्यात आली. तरीसुध्दा ढाबा मालकाने ढाबा न हटविता पक्के बांधकाम केले. त्यामुळे ग्रामपंचाय व पंचायत समिती प्रशासनाने याविरुध्द न्यायालयात धाव घेतली. त्यावर ढाबा मालकाने स्थगनादेश मिळवून ढाबा अद्ययावत सुरू ठेवल्याची माहिती आहे. हा ढाबा अतिक्रमित जागेत उभारल्याची चर्चा आहे. ढाब्याच्या बाजूला केशवराव अढाऊ यांनी सन १९७१ मध्ये बांधलेल्या विहिरीत अंड्याची टरफल्ं टाकली जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.