शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत पंचायत राजमध्ये राज्यात अमरावती झेडपी तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:32 IST

सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देपुरस्कार घोषित : विभागात अचलपूर प्रथम, चांदूर रेल्वे पंचायत समिती द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला.पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत फेब्रुवारीमध्ये जिल्हा पातळीवरची, तर मार्चमध्ये विभागीय पातळीवर तपासणी करण्यात आली. एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय समितीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची पाहणी केली. जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षातील कामांची तपासणी केली. या कालावधीतील सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यांचा समावेश होता. २०१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत झालेले संगणकीकरण, जिल्हा परिषदेत मिळालेले विशेष पुरस्कार याबाबत माहिती घेण्यात आली.जिल्हा परिषद स्वच्छ भारत अभियानात केलेले कार्यासोबतच तत्कालीन सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके व त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी राबविलेले क्लिन मेळघाट, ड्रिम मेळघाट हा नावीन्य उपक्रम व संगणकीय कामकाजासाठी केलेले कार्य या पुरस्कारासाठी यशस्वी ठरले. विशेष म्हणजे पूर्वीच्या पदाधिकाºयांनी आणि अधिकाºयांनी राबविलेल्या योजनांचा जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे व त्यांच्या सहकारी पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनीही कामांना गती दिली. सोबतच नवनवे उपक्रम राबवून याकडे लक्ष दिले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग अभियान, स्वच्छता अभियान यासारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. यासर्व नावीन्यपूर्ण उपक्रमांची फलश्रृती म्हणून जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियानात राज्यातून तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हा परिषदेला हा पुरस्कार येत्या २६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचे हस्ते प्रदान केला जाईल.अचलपूर, चांदूर रेल्वे पंचायत समित्यांची बाजीयशवंत पंचायत राज अभियानात विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथम, तर चांदूर रेल्वे आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती तृतीय पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे.राज्य शासनाच्या सर्वात मोठा असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानाच्या या पुरस्काराने जिल्हा परिषदेची मान उंचावली आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव होय.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष, जिल्हा परिषदउल्लेखनिय कामगिरीमुळे पंचायतराज अभियानात तृतीय क्रमांक मिळाला. झेडपीतील नाविण्यपूर्ण उपक्रमाची ही फलश्रूती आहे. यापुढे राज्यात अव्वल स्थान मिळविण्यास समन्वयातून काम करू- मनीषा खत्री,सीईओ जि.प.