शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

यशवंत पंचायत राजमध्ये राज्यात अमरावती झेडपी तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:32 IST

सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देपुरस्कार घोषित : विभागात अचलपूर प्रथम, चांदूर रेल्वे पंचायत समिती द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक पटकाविला.पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत फेब्रुवारीमध्ये जिल्हा पातळीवरची, तर मार्चमध्ये विभागीय पातळीवर तपासणी करण्यात आली. एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय समितीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची पाहणी केली. जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षातील कामांची तपासणी केली. या कालावधीतील सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यांचा समावेश होता. २०१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत झालेले संगणकीकरण, जिल्हा परिषदेत मिळालेले विशेष पुरस्कार याबाबत माहिती घेण्यात आली.जिल्हा परिषद स्वच्छ भारत अभियानात केलेले कार्यासोबतच तत्कालीन सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके व त्यांच्या सहकारी अधिकाºयांनी राबविलेले क्लिन मेळघाट, ड्रिम मेळघाट हा नावीन्य उपक्रम व संगणकीय कामकाजासाठी केलेले कार्य या पुरस्कारासाठी यशस्वी ठरले. विशेष म्हणजे पूर्वीच्या पदाधिकाºयांनी आणि अधिकाºयांनी राबविलेल्या योजनांचा जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे व त्यांच्या सहकारी पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनीही कामांना गती दिली. सोबतच नवनवे उपक्रम राबवून याकडे लक्ष दिले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग अभियान, स्वच्छता अभियान यासारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. यासर्व नावीन्यपूर्ण उपक्रमांची फलश्रृती म्हणून जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियानात राज्यातून तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हा परिषदेला हा पुरस्कार येत्या २६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचे हस्ते प्रदान केला जाईल.अचलपूर, चांदूर रेल्वे पंचायत समित्यांची बाजीयशवंत पंचायत राज अभियानात विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथम, तर चांदूर रेल्वे आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती तृतीय पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे.राज्य शासनाच्या सर्वात मोठा असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानाच्या या पुरस्काराने जिल्हा परिषदेची मान उंचावली आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव होय.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष, जिल्हा परिषदउल्लेखनिय कामगिरीमुळे पंचायतराज अभियानात तृतीय क्रमांक मिळाला. झेडपीतील नाविण्यपूर्ण उपक्रमाची ही फलश्रूती आहे. यापुढे राज्यात अव्वल स्थान मिळविण्यास समन्वयातून काम करू- मनीषा खत्री,सीईओ जि.प.