शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वनविभागात 'रेड अलर्ट' जारी,  नागरिकांच्या सहकार्याने जंगल बचाव मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:15 IST

राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ जूनपर्यंत 'रेड अलर्ट असून, जंगलात आग विझवण्यासोबत नागरिकांच्या सहकार्याने ती लागूच नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.           कोट्यवधी रोपांची वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलाची दरवर्षी राखरांगोळी होते. यात सरपटणा-या प्राण्यांपासून जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होत असताना पर्यावरणाचे सर्वाधिक प्रमाणात नुकसान होते. जंगलात लागणा-या आगी मानवनिर्मित व नैसर्गिक असतात. आतापर्यंतच्या पाहणीत आगी मानवनिर्मितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आगी रोखण्यासाठी क्षेत्रीय वनकर्मचारी ते वनाधिकारी यांनी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती प्रसार, प्रचार करून वनव्यवस्थापन समित्या व गावातील नागरिकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना वनविभागाच्यावतीने राज्यभर देण्यात आल्या आहेत. 

जाळरेषा जाळण्याचे काम संपलेवनवणवा हंगामांतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत जाळरेषा कापणे व जाळणे ही आगीपासून संरक्षण मिळवणारी कामे प्रत्येक वनक्षेत्रातील वनखंड ते जिल्हा व आंतरराज्य महामार्गावरील जंगलातील सीमारेषेवर करण्यात आली. प्रत्येक वनखंडात ६ मीटर, आंतरराज्य व जिल्हा सीमारेषेवर १२ मीटरपर्यंत जाळरेषा जाळण्यात आल्या. लागलेली आग पुढे पसरू नये, यासाठी अखंड गवताच्या परिसरात रस्त्याच्या आकाराचा काडीकचरा जाळण्यात येतो, त्यालाच जाळरेषा म्हणतात. हे काम आता संपल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले.

सॅटेलाइटहूून आगीची माहितीवनकर्मचा-यांनी जंगलात आग लागल्याची माहिती ठेवण्यासोबतच ती कुठे लागली, ही नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित उपवनसंरक्षक व वरिष्ठ अधिका-यांना सर्वे ऑफ इंडियाकडून सॅटेलाईटद्वारे माहिती पाठविली जाते. परंतु काही वर्षांत मेळघाटसह राज्यातील काही भागात जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याचे सत्य आहे. ते कमी करण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे. जंगलात आगी लागू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून मदत घेण्यासोबत १५ जूनपर्यंत फायर सिझनमध्ये वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचाºयांनी सतर्क राहण्याचे आदेश आहेत. १५ फेब्रुवारी रोजी जाळरेषा जाळण्याचे काम संपले आहे. राहिलेली कामे डीसीएफच्या परवानगीने नव्याने करता येईल. - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग, अमरावती