शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वनविभागात 'रेड अलर्ट' जारी,  नागरिकांच्या सहकार्याने जंगल बचाव मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:15 IST

राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ जूनपर्यंत 'रेड अलर्ट असून, जंगलात आग विझवण्यासोबत नागरिकांच्या सहकार्याने ती लागूच नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.           कोट्यवधी रोपांची वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलाची दरवर्षी राखरांगोळी होते. यात सरपटणा-या प्राण्यांपासून जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होत असताना पर्यावरणाचे सर्वाधिक प्रमाणात नुकसान होते. जंगलात लागणा-या आगी मानवनिर्मित व नैसर्गिक असतात. आतापर्यंतच्या पाहणीत आगी मानवनिर्मितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आगी रोखण्यासाठी क्षेत्रीय वनकर्मचारी ते वनाधिकारी यांनी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती प्रसार, प्रचार करून वनव्यवस्थापन समित्या व गावातील नागरिकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना वनविभागाच्यावतीने राज्यभर देण्यात आल्या आहेत. 

जाळरेषा जाळण्याचे काम संपलेवनवणवा हंगामांतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत जाळरेषा कापणे व जाळणे ही आगीपासून संरक्षण मिळवणारी कामे प्रत्येक वनक्षेत्रातील वनखंड ते जिल्हा व आंतरराज्य महामार्गावरील जंगलातील सीमारेषेवर करण्यात आली. प्रत्येक वनखंडात ६ मीटर, आंतरराज्य व जिल्हा सीमारेषेवर १२ मीटरपर्यंत जाळरेषा जाळण्यात आल्या. लागलेली आग पुढे पसरू नये, यासाठी अखंड गवताच्या परिसरात रस्त्याच्या आकाराचा काडीकचरा जाळण्यात येतो, त्यालाच जाळरेषा म्हणतात. हे काम आता संपल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले.

सॅटेलाइटहूून आगीची माहितीवनकर्मचा-यांनी जंगलात आग लागल्याची माहिती ठेवण्यासोबतच ती कुठे लागली, ही नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित उपवनसंरक्षक व वरिष्ठ अधिका-यांना सर्वे ऑफ इंडियाकडून सॅटेलाईटद्वारे माहिती पाठविली जाते. परंतु काही वर्षांत मेळघाटसह राज्यातील काही भागात जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याचे सत्य आहे. ते कमी करण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे. जंगलात आगी लागू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून मदत घेण्यासोबत १५ जूनपर्यंत फायर सिझनमध्ये वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचाºयांनी सतर्क राहण्याचे आदेश आहेत. १५ फेब्रुवारी रोजी जाळरेषा जाळण्याचे काम संपले आहे. राहिलेली कामे डीसीएफच्या परवानगीने नव्याने करता येईल. - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग, अमरावती