शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वनविभागात 'रेड अलर्ट' जारी,  नागरिकांच्या सहकार्याने जंगल बचाव मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:15 IST

राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ जूनपर्यंत 'रेड अलर्ट असून, जंगलात आग विझवण्यासोबत नागरिकांच्या सहकार्याने ती लागूच नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.           कोट्यवधी रोपांची वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलाची दरवर्षी राखरांगोळी होते. यात सरपटणा-या प्राण्यांपासून जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होत असताना पर्यावरणाचे सर्वाधिक प्रमाणात नुकसान होते. जंगलात लागणा-या आगी मानवनिर्मित व नैसर्गिक असतात. आतापर्यंतच्या पाहणीत आगी मानवनिर्मितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आगी रोखण्यासाठी क्षेत्रीय वनकर्मचारी ते वनाधिकारी यांनी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती प्रसार, प्रचार करून वनव्यवस्थापन समित्या व गावातील नागरिकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना वनविभागाच्यावतीने राज्यभर देण्यात आल्या आहेत. 

जाळरेषा जाळण्याचे काम संपलेवनवणवा हंगामांतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत जाळरेषा कापणे व जाळणे ही आगीपासून संरक्षण मिळवणारी कामे प्रत्येक वनक्षेत्रातील वनखंड ते जिल्हा व आंतरराज्य महामार्गावरील जंगलातील सीमारेषेवर करण्यात आली. प्रत्येक वनखंडात ६ मीटर, आंतरराज्य व जिल्हा सीमारेषेवर १२ मीटरपर्यंत जाळरेषा जाळण्यात आल्या. लागलेली आग पुढे पसरू नये, यासाठी अखंड गवताच्या परिसरात रस्त्याच्या आकाराचा काडीकचरा जाळण्यात येतो, त्यालाच जाळरेषा म्हणतात. हे काम आता संपल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले.

सॅटेलाइटहूून आगीची माहितीवनकर्मचा-यांनी जंगलात आग लागल्याची माहिती ठेवण्यासोबतच ती कुठे लागली, ही नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित उपवनसंरक्षक व वरिष्ठ अधिका-यांना सर्वे ऑफ इंडियाकडून सॅटेलाईटद्वारे माहिती पाठविली जाते. परंतु काही वर्षांत मेळघाटसह राज्यातील काही भागात जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याचे सत्य आहे. ते कमी करण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे. जंगलात आगी लागू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून मदत घेण्यासोबत १५ जूनपर्यंत फायर सिझनमध्ये वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचाºयांनी सतर्क राहण्याचे आदेश आहेत. १५ फेब्रुवारी रोजी जाळरेषा जाळण्याचे काम संपले आहे. राहिलेली कामे डीसीएफच्या परवानगीने नव्याने करता येईल. - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग, अमरावती