शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यातील वनविभागात 'रेड अलर्ट' जारी,  नागरिकांच्या सहकार्याने जंगल बचाव मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:15 IST

राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- नरेंद्र जावरेचिखलदरा (अमरावती) : राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी  वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचा-यांपर्यंत 'अलर्ट' राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ जूनपर्यंत 'रेड अलर्ट असून, जंगलात आग विझवण्यासोबत नागरिकांच्या सहकार्याने ती लागूच नये, अशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.           कोट्यवधी रोपांची वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलाची दरवर्षी राखरांगोळी होते. यात सरपटणा-या प्राण्यांपासून जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होत असताना पर्यावरणाचे सर्वाधिक प्रमाणात नुकसान होते. जंगलात लागणा-या आगी मानवनिर्मित व नैसर्गिक असतात. आतापर्यंतच्या पाहणीत आगी मानवनिर्मितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आगी रोखण्यासाठी क्षेत्रीय वनकर्मचारी ते वनाधिकारी यांनी गावागावांत बैठका घेऊन जनजागृती प्रसार, प्रचार करून वनव्यवस्थापन समित्या व गावातील नागरिकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना वनविभागाच्यावतीने राज्यभर देण्यात आल्या आहेत. 

जाळरेषा जाळण्याचे काम संपलेवनवणवा हंगामांतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत जाळरेषा कापणे व जाळणे ही आगीपासून संरक्षण मिळवणारी कामे प्रत्येक वनक्षेत्रातील वनखंड ते जिल्हा व आंतरराज्य महामार्गावरील जंगलातील सीमारेषेवर करण्यात आली. प्रत्येक वनखंडात ६ मीटर, आंतरराज्य व जिल्हा सीमारेषेवर १२ मीटरपर्यंत जाळरेषा जाळण्यात आल्या. लागलेली आग पुढे पसरू नये, यासाठी अखंड गवताच्या परिसरात रस्त्याच्या आकाराचा काडीकचरा जाळण्यात येतो, त्यालाच जाळरेषा म्हणतात. हे काम आता संपल्याचे वनाधिकाºयांनी सांगितले.

सॅटेलाइटहूून आगीची माहितीवनकर्मचा-यांनी जंगलात आग लागल्याची माहिती ठेवण्यासोबतच ती कुठे लागली, ही नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संबंधित उपवनसंरक्षक व वरिष्ठ अधिका-यांना सर्वे ऑफ इंडियाकडून सॅटेलाईटद्वारे माहिती पाठविली जाते. परंतु काही वर्षांत मेळघाटसह राज्यातील काही भागात जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याचे सत्य आहे. ते कमी करण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढे येणे गरजेचे आहे. जंगलात आगी लागू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून मदत घेण्यासोबत १५ जूनपर्यंत फायर सिझनमध्ये वनाधिकारी ते क्षेत्रीय कर्मचाºयांनी सतर्क राहण्याचे आदेश आहेत. १५ फेब्रुवारी रोजी जाळरेषा जाळण्याचे काम संपले आहे. राहिलेली कामे डीसीएफच्या परवानगीने नव्याने करता येईल. - प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग, अमरावती