शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

अमरावतीला पाच वर्षांत आगळी ओळख!

By admin | Updated: January 4, 2015 23:01 IST

पाच वर्षांनंतर अमरावती हे राज्यातील आगळे उन्नत शहर असेल, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी व्यक्त केला. सुंदर, स्वच्छ, रोजगाराच्या भरपूर संधी असलेले

पालकमंत्र्यांचा निर्धार : रस्ते होणार स्मार्ट, मुक्तागिरीचा सर्वंकष विकासअमरावती : पाच वर्षांनंतर अमरावती हे राज्यातील आगळे उन्नत शहर असेल, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी व्यक्त केला. सुंदर, स्वच्छ, रोजगाराच्या भरपूर संधी असलेले आपले देखणे शहर असावे, असे स्वप्न मी बघितले आहे. विशेष म्हणजे अशा जिल्हा मुख्यालयाच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबलेल्या असतील. स्वप्नातील अशी नगरी पूर्णत्त्वास येण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ना. पोटे यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्रीपदी मी पहिल्यांदाच विराजमान झालो असलो तरी माझा अनुभव नवीन नाही. उलटपक्षी शहर निर्मितीच्या कार्यात माझे 'स्पेशलायझेयन' आहे, असे सूचक उत्तर त्यांनी दिशाभूल करू पाहणाऱ्या यंत्रणेला इशारा देताना दिले. योगायोगाने माझ्या महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग आहे. कुठल्या कामासाठी किमान खर्च किती लागेल, याची अभ्यासू माहिती मला त्यांच्याकडून मिळते. त्याचा मला योग्य वापर करता येईल, असेही ना. पोटे म्हणाले. डीपीडीसीच्या माध्यमातून यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधीची तरतूद नव्हती. सदर संस्थांनाही आता डीपीडीसीतून निधी दिला जाईल, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेशनुकताच आलेला पाऊस कुठे लाभदायक तर कुठे नुकसानकारक ठरला. कापसाची जी बोंडे फुटली त्यांच्यासाठी अपायकारक तर जी बोंडे फुटायची आहे त्यांच्यासाठी उपायकारक अशी स्थिती कपाशीची आहे. तुरीबाबतही चित्र हेच आहे. संत्र्यांच्या अंबिया बहराचे काही भागात नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या भागात पिकांच्या अवस्थेनुसार पावसाचा परिणाम जाणवला. प्रशासनाला तसा अचूक माहिती असलेला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, निर्णय घेतला जाईल. ं'स्मार्ट सिटी'स्मार्ट सिटीच्या यादीत अमरावती शहराचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत शहर विकसित करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांमध्ये शहर बसायला हवे. त्यादृष्टीने आढावा सुरू आहे. नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल यावर भर दिला जात आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. सूचनांचे स्वागत, सर्वमिळून विकास!अमरावतीचा विकास करताना सर्वच घटकांतील लोकांच्या उपयोगी सूचनांचे स्वागत केले जाईल. व्यापारी, पत्रकार, बुद्धीवंत, तंत्रज्ञ, नोकरदार, विद्यार्थी, महिला, सामान्यजन आणि सर्वपक्षीय आमदारांचे योगदान या विकासासाठी लाभणार आहे. सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. मुक्तागिरीचा विकासजैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्तागिरी येथे वर्षाकाठी दीड ते पाऊणेदोन लक्ष भक्त आणि पर्यटक भेट देतात. या तीर्थस्थानाकडे मध्यप्रदेशातून येणारा रस्ता गुळगुळीत अणि महाराष्ट्रातून जाणारा रस्ता खस्ताहाल आहे. या रस्त्याचे नवीन बांधकाम केले जाईल. पंजाब, दिल्ली यासारख्या भागांतूनही पर्यटकांना खेचणाऱ्या या नयनरम्य तिर्थस्थानाचा सर्वंकष विकास केला जाईल. पर्यटकांना अधिकाधिकरित्या आकर्षित करणारे ते पर्यटनस्थळ व्हावे, असा मानस असल्याचे पालकमंत्री म्हणाले.