शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

अमरावतीला पाच वर्षांत आगळी ओळख!

By admin | Updated: January 4, 2015 23:01 IST

पाच वर्षांनंतर अमरावती हे राज्यातील आगळे उन्नत शहर असेल, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी व्यक्त केला. सुंदर, स्वच्छ, रोजगाराच्या भरपूर संधी असलेले

पालकमंत्र्यांचा निर्धार : रस्ते होणार स्मार्ट, मुक्तागिरीचा सर्वंकष विकासअमरावती : पाच वर्षांनंतर अमरावती हे राज्यातील आगळे उन्नत शहर असेल, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी व्यक्त केला. सुंदर, स्वच्छ, रोजगाराच्या भरपूर संधी असलेले आपले देखणे शहर असावे, असे स्वप्न मी बघितले आहे. विशेष म्हणजे अशा जिल्हा मुख्यालयाच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबलेल्या असतील. स्वप्नातील अशी नगरी पूर्णत्त्वास येण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ना. पोटे यांनी स्पष्ट केले. राज्यमंत्रीपदी मी पहिल्यांदाच विराजमान झालो असलो तरी माझा अनुभव नवीन नाही. उलटपक्षी शहर निर्मितीच्या कार्यात माझे 'स्पेशलायझेयन' आहे, असे सूचक उत्तर त्यांनी दिशाभूल करू पाहणाऱ्या यंत्रणेला इशारा देताना दिले. योगायोगाने माझ्या महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग आहे. कुठल्या कामासाठी किमान खर्च किती लागेल, याची अभ्यासू माहिती मला त्यांच्याकडून मिळते. त्याचा मला योग्य वापर करता येईल, असेही ना. पोटे म्हणाले. डीपीडीसीच्या माध्यमातून यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधीची तरतूद नव्हती. सदर संस्थांनाही आता डीपीडीसीतून निधी दिला जाईल, असा निर्णय त्यांनी जाहीर केला. नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेशनुकताच आलेला पाऊस कुठे लाभदायक तर कुठे नुकसानकारक ठरला. कापसाची जी बोंडे फुटली त्यांच्यासाठी अपायकारक तर जी बोंडे फुटायची आहे त्यांच्यासाठी उपायकारक अशी स्थिती कपाशीची आहे. तुरीबाबतही चित्र हेच आहे. संत्र्यांच्या अंबिया बहराचे काही भागात नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या भागात पिकांच्या अवस्थेनुसार पावसाचा परिणाम जाणवला. प्रशासनाला तसा अचूक माहिती असलेला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, निर्णय घेतला जाईल. ं'स्मार्ट सिटी'स्मार्ट सिटीच्या यादीत अमरावती शहराचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत शहर विकसित करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांमध्ये शहर बसायला हवे. त्यादृष्टीने आढावा सुरू आहे. नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्यावर मात कशी करता येईल यावर भर दिला जात आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. सूचनांचे स्वागत, सर्वमिळून विकास!अमरावतीचा विकास करताना सर्वच घटकांतील लोकांच्या उपयोगी सूचनांचे स्वागत केले जाईल. व्यापारी, पत्रकार, बुद्धीवंत, तंत्रज्ञ, नोकरदार, विद्यार्थी, महिला, सामान्यजन आणि सर्वपक्षीय आमदारांचे योगदान या विकासासाठी लाभणार आहे. सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. मुक्तागिरीचा विकासजैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्तागिरी येथे वर्षाकाठी दीड ते पाऊणेदोन लक्ष भक्त आणि पर्यटक भेट देतात. या तीर्थस्थानाकडे मध्यप्रदेशातून येणारा रस्ता गुळगुळीत अणि महाराष्ट्रातून जाणारा रस्ता खस्ताहाल आहे. या रस्त्याचे नवीन बांधकाम केले जाईल. पंजाब, दिल्ली यासारख्या भागांतूनही पर्यटकांना खेचणाऱ्या या नयनरम्य तिर्थस्थानाचा सर्वंकष विकास केला जाईल. पर्यटकांना अधिकाधिकरित्या आकर्षित करणारे ते पर्यटनस्थळ व्हावे, असा मानस असल्याचे पालकमंत्री म्हणाले.