शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

उघड्यावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर!

By admin | Updated: June 20, 2015 00:33 IST

पावसाळ्यात दूषित पाणी आणि दूषित अन्नाच्या सेवनामुळे रोगराई वाढण्याची भीती असते.

रोगराई वाढणार : ‘ई-कोलाय’चा प्रादुर्भाव ठरू शकतो धोकादायक वैभव बाबरेकर अमरावतीपावसाळ्यात दूषित पाणी आणि दूषित अन्नाच्या सेवनामुळे रोगराई वाढण्याची भीती असते. त्यातच शहरात उघड्यावर विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमुळे अमरावतीकरांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी उघड्यावर सर्रास अन्नपदार्थांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यान्नांचा वापर टाळून आरोग्य जपण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला देण्यात आला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. सततच्या पावसामुळे घरातही कोंदट वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. पाण्यामुळे किडे व जंतू अधिक सक्रिय होत असल्यामुळे लगेच आजार बळावण्याची शक्यता असते. ताप सर्वसाधारण बाराही महिने पाहायला मिळते. मात्र, या दिवसांत तापासह खोकला, सर्दी, टायफाईड, गोवर, डायरिया, उलट्या, कावीळ अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. शहरात उघड्या अन्नपदार्थावर माशा व कीटक बसतात. त्यातच गलिच्छ ठिकाणीच अन्न पदार्थांची विक्री होत असल्यामुळे जंतू अधिक सक्रिय होतात.पावसाळ्यात उघड्यावरील अन्न पदार्थावर माशी व कीटक बसतात. त्यांच्यामुळे विविध प्रकारचे जंतू शरीरात जाऊन आजार बळावतात. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी.