शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

एसीपींच्या तक्रार पेट्यांना एकवर्ष पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:11 IST

जिल्ह्यात साडेतीनशे तक्रार पेट्या लोकोपयोगी उपक्रम अनिल कडू परतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी त्यांच्या कल्पकतेतून ...

जिल्ह्यात साडेतीनशे तक्रार पेट्या लोकोपयोगी उपक्रम

अनिल कडू

परतवाडा : जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी त्यांच्या कल्पकतेतून लोकोपयोगी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या साडेतीनशे तक्रार पेट्यांना एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी जिल्हाभर आपल्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या पेट्या वितरित केल्या आहेत. शाळा, महािवद्यालयांसह शहरातील, गावांतील चौकाचौकांत, वर्दळीच्या मोक्याच्या ठिकाणी लावल्या आहेत.

या कुलूपबंद पेट्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात आहेत. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, तक्रारी दुसऱ्यावरील अन्यायाविरुद्धची चीड, पोलीस प्रशासनातील उणीव, पोलिसांची वागणूक अवैध धंद्याची माहिती, त्रास देण्याऱ्यांची नावे, कारवाईबाबतची अपेक्षा आणि गुन्हेगारांसह चिडीमारांची नावे थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचविण्यास या तक्रार पेट्या उपयुक्त ठरल्या आहेत.

या पेट्या लावण्यापूर्वी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी शाळा, महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, प्रसंगानुरुप नागरिकांशी व पालकांशी संवाद साधला. पेट्यांची उपयुक्तता आणि कार्यपद्धतीबाबत स्वत:ची कार्यपद्धती व भूमिका त्यांनी मांडली. निर्भीडपणे आपल्या तक्रारी, सूचना, या तक्रारपेटीच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. निश्चित कार्यवाहीबाबत त्यांनी आश्वस्तही केले. गोपनीयतेची हमीही दिली.

या तक्रारपेट्या उघडून त्यातील तक्रारींची दखल घेण्याकरिता जिल्हास्तरावर एक स्वतंत्र स्कॉडही त्यांनी कार्यन्वित केले. या कुलूपबंद पेट्यांच्या किल्ल्या स्वत:कडे ठेवल्यात. दर शनिवारी किंवा ठराविक अवधीनंतर या पेट्या उघडल्या जाऊ लागल्यात. या पेटीतील तक्रारी आणि तक्रारकर्त्यांबाबत गोपनियता बाळगली गेली. अनेक प्रकरणांत पेटीतील तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईसुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून केल्या गेली. यात या लोकोपयोगी उपक्रमातील या तक्रारपेट्या नागरिकांसह, विद्यार्थी व पालकांना दिलासादायक ठरल्या आहेत.

या पेट्यांची उपयोगिता बघता नागरिक, विद्यार्थी त्या पेट्यांकडे वळले असून, लॉकडाऊनचा अपवाद वगळता आजही त्या पेट्या उघडल्या जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा हा लोकोपयोगी उपक्रम राबविला जात आहे.

जिल्हाभर लावल्या गेलेल्या या तक्रार पेट्यांचे लोकेशनही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. चार-दोन अपवाद वगळता वर्षभरापूर्वी लावलेल्या त्या सर्व तक्रार पेट्या आपआपल्या लोकेशनवर आज ही कायम आहेत. या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक थेट लोकांच्या पाठीशी उभे आहेत.