शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

६० कोटींचा प्रकल्प २५० कोटींवर

By admin | Updated: March 6, 2016 00:02 IST

अमरावती तालुक्यातील सिंचनाचा टक्का वाढावा, शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकारावे, ...

प्रकल्पग्रस्तांचा विरोध : पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पअमरावती : अमरावती तालुक्यातील सिंचनाचा टक्का वाढावा, शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकारावे, यासाठी पेढी नदीवर उपसा सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली; तथापि ८ वर्षे उलटूनही हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. त्यामुळे मूळ ६० कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आता थेट २५० कोटींवर पोहोचला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अमरावती तालुक्यातील रोहनखेडा पर्वतापूर आणि दोनद (अंशत:) ही गावे या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात येतात. पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाला २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. रोहनखेडा पर्वतपूर व टेंभा येथील ३०० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहित करायची आहे. यातील १५० हेक्टर जमिनीची सरळ खरेदी पध्दतीने मोबदला देण्यात आला आहे. सात ते आठ लाख रुपये प्रतिहेक्टरने तेथील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. मात्र उर्वरित भूसंपादन रखडले आहे. (प्रतिनिधी)पुनर्वसनस्थळाला विरोधरोहनखेडा-पर्वतपूर येथील ग्रामस्थांना अमरावती शहरालगत पुनर्वसन हवे आहे. मात्र त्यांचे पुनर्वसनलगतच्या पुसदा येथे प्रस्तावित केल्याने पुनर्वसन स्थळाला गावकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत ग्रामस्थांचा शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तथापि पुनर्वसनाचा तिढा न सुटल्याने प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरच या पेढी उपसा बॅरेजचे भवितव्य ठरणार आहे. पुनर्वसनाऐवजी एकरकमी मोबदला देण्याची मागणी शासनस्तरावर प्रलंबित असल्याने या प्रकल्पाचे भवितव्य तूर्तास अधांतरी आहे. पेढी बॅरेजची सद्यस्थितीपेढी बॅरेजच्या उपसासिंचन प्रकल्पाला २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पात रोहनखेडा पर्वतापूर येथील ४३७ आणि दोनद येथील १५० कुटुंबांचे पुनर्वसन करावयाचे आहे. रोहनखेडचे पुनर्वसन पुसदा येथे तर दोनदचे पुनर्वसन रुस्तमपूर येथे प्रस्तावित आहे. रोहनखेडा व पर्वतापूर पुनर्वसनाकरिता २७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांचा जोरदार विरोधपुसदा येथे पुनर्वसनाकरिता प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. रोहनखेडा व पर्वतापूर या दोन गावांकरिता पुनर्वसन स्थळाविषयी गावकऱ्यांचा विरोध असल्याने भूखंडाऐवजी एकमुस्त मोबदला देण्याची मागणी पुनर्वसित होणाऱ्या गावकऱ्यांनी केली आहे. त्या मागणीनुसार सदर प्रस्ताव १० मार्च २०१५ ला आयुक्तांकडून शासनास सादर करण्यात आला आहे. रोहनखेडा-पर्वतापूर येथील बाधित कुटुंबांना पुनर्वसनाऐवजी एकमुस्त रक्कम देण्याच्या प्रस्तावाला महसूल मंत्र्याकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रस्तावाला पुनर्वसन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. - सु.गो. राठी, कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभागपुसदा येथे प्रस्तावित पुनर्वसनाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. भूखंडाऐवजी एकमुस्त मोबदला देण्याची मागणीबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर पोहचला आहे. - जयंत देशपांडे, जिल्हा भूसंपादन तथा प्रभारी पुनर्वसन अधिकारी, अमरावती.