शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादकांना २ हजार कोटींचा फटका

By admin | Updated: July 10, 2014 23:19 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस

मृगबहराची फूट नाही : पावसाअभावी ५० हजार हेक्टरवरील संत्राबागांचे नुकसानगजानन मोहोड - अमरावतीविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस यावर्षी नाही. अल्प प्रमाणातील आंबिया बहाराची फळे देखील सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे गळू लागली आहेत. जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारावर विसंबवून असतो. मात्र, दीड महिन्यांपासून खंडित पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे किमान २ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरूड तालुक्यातील आहे. यांसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांची भिस्त मृगबहरावरच!संत्राला आंबिया बहर साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ मुबलक पाण्याची सोय आहे, ते आंबिया बहर घेतात. इतर ६० ते ७० टक्के शेतकरी पाण्याअभावी मृगबहारावर विसंबून असतात. यासाठी झाडाला दोन महिने ताण दिला जातो. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यावर आर्द्रता निर्माण होते. याचवेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहाराच्या प्रक्रियेत फुटून येतात. किंवा झाडाला नवीन पाने येतात. दुर्दैवाने यावर्षी मृगबहरासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत. असे झाले संत्रा उत्पादकांचे नुकसान जिल्ह्यात ८० हजार हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रात मृगबहर घेतला जातोे. एका हेक्टरमध्ये सर्वसाधारण ३०० झाडे असतात. यामध्ये ८ ते १० टन संत्रा उत्पादन घेतल्या जाते. तूर्तास संत्राचा भाव हजार फळांना दोन हजार रूपये आहे. या स्थितीत १६ ते २० हजार रूपये टन या अंदाजात एका हेक्टरमध्ये दीड ते दोन लाखांचे उत्पन्न संत्रा उत्पादकाला व्हायला हवे. जिल्ह्यातील मृगबहराची एकूण अवस्था बघता संत्रा उत्पादकांचे अंदाजे २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.