शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

संत्रा उत्पादकांना २ हजार कोटींचा फटका

By admin | Updated: July 10, 2014 23:19 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस

मृगबहराची फूट नाही : पावसाअभावी ५० हजार हेक्टरवरील संत्राबागांचे नुकसानगजानन मोहोड - अमरावतीविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस यावर्षी नाही. अल्प प्रमाणातील आंबिया बहाराची फळे देखील सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे गळू लागली आहेत. जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारावर विसंबवून असतो. मात्र, दीड महिन्यांपासून खंडित पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे किमान २ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरूड तालुक्यातील आहे. यांसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांची भिस्त मृगबहरावरच!संत्राला आंबिया बहर साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ मुबलक पाण्याची सोय आहे, ते आंबिया बहर घेतात. इतर ६० ते ७० टक्के शेतकरी पाण्याअभावी मृगबहारावर विसंबून असतात. यासाठी झाडाला दोन महिने ताण दिला जातो. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यावर आर्द्रता निर्माण होते. याचवेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहाराच्या प्रक्रियेत फुटून येतात. किंवा झाडाला नवीन पाने येतात. दुर्दैवाने यावर्षी मृगबहरासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत. असे झाले संत्रा उत्पादकांचे नुकसान जिल्ह्यात ८० हजार हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रात मृगबहर घेतला जातोे. एका हेक्टरमध्ये सर्वसाधारण ३०० झाडे असतात. यामध्ये ८ ते १० टन संत्रा उत्पादन घेतल्या जाते. तूर्तास संत्राचा भाव हजार फळांना दोन हजार रूपये आहे. या स्थितीत १६ ते २० हजार रूपये टन या अंदाजात एका हेक्टरमध्ये दीड ते दोन लाखांचे उत्पन्न संत्रा उत्पादकाला व्हायला हवे. जिल्ह्यातील मृगबहराची एकूण अवस्था बघता संत्रा उत्पादकांचे अंदाजे २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.