शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

संत्रा उत्पादकांना २ हजार कोटींचा फटका

By admin | Updated: July 10, 2014 23:19 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस

मृगबहराची फूट नाही : पावसाअभावी ५० हजार हेक्टरवरील संत्राबागांचे नुकसानगजानन मोहोड - अमरावतीविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रख्यात वरूड, मोर्शीसह जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक क्षेत्रातील संत्राबागांमध्ये मृगबहर फुटलाच नाही. मृगबहरासाठी आवश्यक नैसर्गिक वातावरण, आर्द्रता व भरपूर पाऊस यावर्षी नाही. अल्प प्रमाणातील आंबिया बहाराची फळे देखील सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे गळू लागली आहेत. जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारावर विसंबवून असतो. मात्र, दीड महिन्यांपासून खंडित पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचे किमान २ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ४५ टक्के क्षेत्र मोर्शी व वरूड तालुक्यातील आहे. यांसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात देखील सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे ६० ते ७० टक्के संत्रा उत्पादक नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृगबहारालाच प्राधान्य देतात. जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांची भिस्त मृगबहरावरच!संत्राला आंबिया बहर साधारणत: जानेवारी महिन्यात फुटतो. परंतु जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांजवळ मुबलक पाण्याची सोय आहे, ते आंबिया बहर घेतात. इतर ६० ते ७० टक्के शेतकरी पाण्याअभावी मृगबहारावर विसंबून असतात. यासाठी झाडाला दोन महिने ताण दिला जातो. परिणामी झाडे छोट्या फांद्यामध्ये अन्नद्रव्ये साठवितात. जून महिन्यात मृगाचा पाऊस पडल्यावर आर्द्रता निर्माण होते. याचवेळी साठवलेली अन्नद्रव्ये मृगबहाराच्या प्रक्रियेत फुटून येतात. किंवा झाडाला नवीन पाने येतात. दुर्दैवाने यावर्षी मृगबहरासाठी प्रतिकूल स्थिती असल्याने संत्रा उत्पादक अडचणीत आले आहेत. असे झाले संत्रा उत्पादकांचे नुकसान जिल्ह्यात ८० हजार हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. यापैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रात मृगबहर घेतला जातोे. एका हेक्टरमध्ये सर्वसाधारण ३०० झाडे असतात. यामध्ये ८ ते १० टन संत्रा उत्पादन घेतल्या जाते. तूर्तास संत्राचा भाव हजार फळांना दोन हजार रूपये आहे. या स्थितीत १६ ते २० हजार रूपये टन या अंदाजात एका हेक्टरमध्ये दीड ते दोन लाखांचे उत्पन्न संत्रा उत्पादकाला व्हायला हवे. जिल्ह्यातील मृगबहराची एकूण अवस्था बघता संत्रा उत्पादकांचे अंदाजे २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.