शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पावसाळ्यापासून १३० आत्महत्या, शासनाच्या लेखी तरीही आलबेल !

By admin | Updated: October 17, 2015 00:17 IST

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळला.

अमरावती : यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळला. खरिपाचे मुख्य पीक सोयाबीनमध्ये रोटाव्हेटर फिरविण्याचे सत्र जिल्हाभरात सुरू आहे. शुक्रवारी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत जिल्ह्यातील १,९८१ गावांपैकी एकाही गावाचा समावेश नाही. जिल्ह्यात आलबेल स्थिती दर्शविली हे धक्कादायक आहे.यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. पेरणी पश्चात पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी मारली. सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नसल्याने शेंगा पोचट राहिल्या. त्यातच पिवळ्या मोझॅकच्या अटॅकमुळे दाणा भरलाच नाही, एकरी पोतभर झडती येण्याची आशा नाही, उत्पादन खर्च दूर, मळणीचा खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी सोयाबीनच्या उभ्या पिकात नांगर फिरवीत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.परतीचा पुरेसा पाऊस नाही, त्यामुळे जमिनीत आर्द्रता नाही. यामुळे कापूस, तुरीची वाढ खोळंबली आहे. कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीवर किडी व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन खर्च निघणार की नाही या घोर चिंतेत शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत असताना त्याच्या पदरी निराशा आली आहे. जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्र असणाऱ्या जिरायती क्षेत्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बागायती क्षेत्रातील अवस्थादेखील बिकट आहे. जिल्ह्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा आहे. आंबिया बहाराची फळगळ होत आहे. संत्र्याचे मार्केट पुरते कोलमडले आहे. भाव कमी असल्याने व्यापारी फिरकेनाशे झाले आहेत. पुढचा बहर घेण्यासाठी संत्रा तोड एव्हाना व्हायला हवी होती. मात्र, खरेदीदारांअभावी संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. खरीपही गेला, रबीची तीच अवस्था, अन् शासन म्हणते जिल्हा आलबेल ही शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)