शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

यंदा परदेशी पक्ष्यांनी फिरविली पातुरच्या निसर्गाकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

अकोला जिल्ह्यातील विविध प्रकारच्या पाणवठ्यांवर मात्र या पक्ष्यांच्या ‘गेट टुगेदरला’ दुर्दैवाने अजूनही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. स्थलांतर ही ...

अकोला जिल्ह्यातील विविध प्रकारच्या पाणवठ्यांवर मात्र या पक्ष्यांच्या ‘गेट टुगेदरला’ दुर्दैवाने अजूनही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही.

स्थलांतर ही पक्ष्यांची प्राचीन परंपरा आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास हा त्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग आहे. काही पक्षी प्रवासादरम्यान प्रजनन करतात. यातच पिल्ले मोठी होतात आणि उडायला लागल्यावर काही महिन्यांत मोठा प्रवास सुरू होतो. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण म्हणजे अन्नाचा तुटवडा. उत्तरेकडील प्रदेश बर्फाच्छादित झाला की, पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण होते. छोट्या झुडपांसह मोठी झाडेदेखील बर्फाखाली झाकली जातात. या काळात अन्नासाठी पक्ष्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुख्यत: ग्रीनलॅन्ड, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, उत्तर चीन, दक्षिण अमेरिका, अलास्का, मंगोलिया, मध्य आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून अडीचशेहून अधिक प्रकारचे पक्षी भारतात मुक्कामाला येतात. यातील अनेक पक्ष्यांचा मुक्काम महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाणवठ्यावर किंवा माळरानावर असतो.

ऑक्टोबर हीट ओसरली की, विदर्भातील विविध प्रकारच्या जलाशयांवर नेहमीची बदके आणि करकोचांपेक्षा नवे चेहरे दिसायला सुरुवात होते. नोव्हेंबरमध्ये नवीन थवे दाखल होतात. फ्लेमिंगो पक्षी कधी इतरांच्या तुलनेत उशिरा; तर कधी बरोबरच दाखल होतात. काही पक्षी माळराने, गवताळ प्रदेशात उतरतात, तर पाणवठ्यांवरील पक्षी लहान-मोठ्या जलाशयांच्या किनाऱ्यांवर बस्तान बसवतात. हे पक्षी कोठून आले. त्यानुसार त्यांच्या परतीच्या वेळा बदलतात. साधारणत: मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचा मुक्काम असतो. या सर्व बाबींचा आढावा निसर्गप्रेमी प्रा. भाष्कर काळे यांनी घेतला आहे.

फोटो: