शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

यंदा परदेशी पक्ष्यांनी फिरविली पातुरच्या निसर्गाकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

अकोला जिल्ह्यातील विविध प्रकारच्या पाणवठ्यांवर मात्र या पक्ष्यांच्या ‘गेट टुगेदरला’ दुर्दैवाने अजूनही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. स्थलांतर ही ...

अकोला जिल्ह्यातील विविध प्रकारच्या पाणवठ्यांवर मात्र या पक्ष्यांच्या ‘गेट टुगेदरला’ दुर्दैवाने अजूनही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही.

स्थलांतर ही पक्ष्यांची प्राचीन परंपरा आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास हा त्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग आहे. काही पक्षी प्रवासादरम्यान प्रजनन करतात. यातच पिल्ले मोठी होतात आणि उडायला लागल्यावर काही महिन्यांत मोठा प्रवास सुरू होतो. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण म्हणजे अन्नाचा तुटवडा. उत्तरेकडील प्रदेश बर्फाच्छादित झाला की, पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण होते. छोट्या झुडपांसह मोठी झाडेदेखील बर्फाखाली झाकली जातात. या काळात अन्नासाठी पक्ष्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुख्यत: ग्रीनलॅन्ड, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, उत्तर चीन, दक्षिण अमेरिका, अलास्का, मंगोलिया, मध्य आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून अडीचशेहून अधिक प्रकारचे पक्षी भारतात मुक्कामाला येतात. यातील अनेक पक्ष्यांचा मुक्काम महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाणवठ्यावर किंवा माळरानावर असतो.

ऑक्टोबर हीट ओसरली की, विदर्भातील विविध प्रकारच्या जलाशयांवर नेहमीची बदके आणि करकोचांपेक्षा नवे चेहरे दिसायला सुरुवात होते. नोव्हेंबरमध्ये नवीन थवे दाखल होतात. फ्लेमिंगो पक्षी कधी इतरांच्या तुलनेत उशिरा; तर कधी बरोबरच दाखल होतात. काही पक्षी माळराने, गवताळ प्रदेशात उतरतात, तर पाणवठ्यांवरील पक्षी लहान-मोठ्या जलाशयांच्या किनाऱ्यांवर बस्तान बसवतात. हे पक्षी कोठून आले. त्यानुसार त्यांच्या परतीच्या वेळा बदलतात. साधारणत: मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचा मुक्काम असतो. या सर्व बाबींचा आढावा निसर्गप्रेमी प्रा. भाष्कर काळे यांनी घेतला आहे.

फोटो: