शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

वारा येताच होतो वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: May 11, 2014 22:05 IST

साखरडोह वीज उपकेंद्राचा अजब कारभार ; ग्रामस्थांना होतोय नाहक त्रास

साखरडोह : ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र असलेल्या साखरडोह येथील उपकेंद्रातून १२ ते १४ गावांना विद्युत पुरवठा केल्या जातो. परंतु कोणत्याही वेळेला वीजपुरवठा सुरु व बंद होत असल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच त्रासले आहेत. सध्या वारा आला की लाईन गेली, अशी परिस्थिती झालेली आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांना रात्रभर अंधारातच राहावे लागले. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास तो सुरुच करीत नाहीत. असा गावातील नागरिकांचा अनुभव आहे. विद्युत पुरवठा करणार्‍या तारेवरच्या मार्गात येणार्‍या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक असताना याकडे मात्र महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसत आहे. विद्युत पुरवठा करणार्‍या तारा झाडामधून जात असल्यामुळे झाडांना या फांद्याचा स्पर्श झाला की, पुरवठा खंडित होतो. तसेच साखरडोह गावाला विद्युतपुरवठा करणारे विद्युत रोहित्र खराब झाले आहे. त्यामध्ये फ्युज या पन्नाच दिसत नाही. मागील वर्षी आलेल्या वारा व पावसामुळे विद्युत पोल खाली पडण्याच्या स्थितीत आले आहे. यावर्षी हरभरा, गहू पिकविणार्‍या शेतकरी बांधवांनी त्याला काठीचा आधार दिला हे पोल उन्हाळय़ात दुरुस्त न झाल्यास पावसाळय़ात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. तारा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ढिल्या झालेल्या आहेत. त्या सुद्धा व्यवस्थित करणे आवश्यक असताना त्याकडे महावितरणच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. रोडवर व विद्युत उपकेंद्र असलेल्या गावातील विद्युत पुरवठय़ाची अवस्था अशा प्रकारची असेल तर दुसर्‍या गावची काय स्थिती असेल असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.