शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर; चौकीदारांची रखवाली नावापुरतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:03 IST

तीन जलकुंभ रामभरोस: जलप्रदाय विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोलेकरांना शहरातील १३ जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. जलकुंभांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागात आस्थापनेवर असणाऱ्या चौकीदारांची नियुक्ती करण्यात आली असली तरी यातील काही चौकीदार केवळ नावापुरतीच रखवाली करीत असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान उघडकीस आले. १३ पैकी तीन जलकुंभांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असून, जलप्रदाय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरात १३ ठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे. महान धरणातून पाण्याचा उपसा केल्यानंतर ६५ व २५ एमएलडीच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ केले जाते. मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्यात येते. पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी जलप्रदाय विभागाने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे झोन निर्माण करून कनिष्ठ अभियंत्यांकडे देखरेखीची जबाबदारी सोपवली आहे. वेळापत्रकानुसार मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व उघडून जलकुंभांमध्ये पाणी भरणे, नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासह जलकुंभांची सुरक्षा राखण्यासाठी जलप्रदाय विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जलकुंभांच्या सुरक्षेसाठी चौकीदार असतानासुद्धा रात्री-अपरात्री सदर आवारात असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याचे पाहून मनपा प्रशासनाने शहरातील सर्व जलकुंभांसाठी आवारभिंती उभारल्या. यामुळे मोकाट जनावरे, डुकरे, कुत्र्यांचा मुक्त संचार कमी होण्यासोबतच टवाळखोरांचा वावर कमी झाला. असे असले तरी १३ पैकी तीन जलकुंभांवर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसल्याचे स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आले. हरिहरपेठ भागातील एक आणि शिवनगरमधील दोन अशा तीन जलकुंभांची सुरक्षा रामभरोसे असून, हरिहरपेठमधील जलकुं भाची सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नसल्याचे दिसून आले. मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून मनपाचे कर्मचारी गायब असल्याचे चित्र होते. शिवनगरमधील दोन जलकुंभांच्या सुरक्षेसाठी चौकीदार असला तरी प्रवेशद्वार सताड उघडे होते. संबंधित चौकीदाराला आवाज दिला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद न देणे पसंत केले. यावरून चौकीदार किती दक्ष राहतात, याचा यानिमित्ताने प्रत्यय आला. हरिहरपेठस्थित जलकुंभाकडे दुर्लक्ष का?जुने शहरातील हरिहरपेठस्थित जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कागदोपत्री दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कर्मचारी रात्रभर सेवारत राहत नसल्याची माहिती आहे. या ठिकाणी खोली बांधून कायमस्वरूपी चौकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.पथदिव्यांची तोकडी व्यवस्था!मध्यंतरी मनपा प्रशासनाने ११ कोटी ८४ लाख रुपयांतून जलकुंभांना आवारभिंत, जलवाहिन्या बदलण्याची कामे केली. शिवनगरमध्ये दोन जलकुंभ असून, आवारात केवळ दोन ट्युबलाइट लावण्यात आले आहेत. या ठिकाणी एलईडी लाइट बसविण्याची नितांत गरज आहे. या ठिकाणी आढळले चौकीदार!नेहरू पार्क, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, आदर्श कॉलनी, स्टेशन चौक, महाजनी प्लॉट, केशवनगर, व्हीएचबी कॉलनीस्थित जलकुंभांच्या ठिकाणी चौकीदार हजर असल्याचे आढळून आले.