शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

विदर्भातील संत्रा फलोत्पादनावर भर!

By admin | Updated: March 17, 2016 02:35 IST

डॉ. पंदेकृवि माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करणार.

अकोला: विदर्भातील ख्यातिप्राप्त नागपुरी संत्र्याला भौगोलिक निर्देशन मिळाल्यानंतर या संत्र्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळाली आहे. या संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आता माहिती-तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यानंतर या संत्र्याच्या उत्पादन वाढीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी शेतकर्‍यांच्या शेतावर घनदाट लागवड पद्धतीचा पथदश्री प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हेक्टरी २५ टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट या विद्यापीठाने समोर ठेवले होते. यात काही अंशी यश प्राप्त होत आहे. विदर्भात जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र आहे; परंतु या संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टन उत्पादन फार कमी शेतकरी घेतात. देश-विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्‍यांना ते दिलासादायक ठरणार असल्याने या संत्र्यावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. इंडो-इस्त्रायल या नावाने नागपूर, अमरावती येथील शेतकर्‍यांच्या शेतावर प्रकल्प राबवला आहे. विदर्भातील संत्राफळाचे उत्पादन वाढवायचे असल्याने माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनाही मार्गदर्शन करावे लागणार आहे. संत्रा या पिकावर डिंक्या व मूळकुज रोगाचा होणारा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. जास्त पाणी दिले म्हणजे जास्त उत्पादन होते, असा जो समज रू ढ आहे, त्यावर प्रबोधन करणे क्रमप्राप्त असून, हेच या रोगाचे मूळ कारण असल्याचे शेतकर्‍यांना समजावून सांगावे लागणार आहे. यासाठीचे पाऊल कृषी विद्यापीठाने उचलले असून, या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पाच दिवस मंथन होत आहे. त्यासाठी राज्यातून या विषयावरील शास्त्रज्ञ येथे आले आहेत.