शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा घेतला गेलेला; पण योग्य निर्णय

By admin | Updated: July 4, 2014 00:41 IST

मराठा आणि मुस्लीम समाज आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर असल्यामुळे हा समाज शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात दुर्लक्षित होता.

अकोला : समाजातील जो घटक मुख्य प्रवाहापासून वंचित आहे त्यांना या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. मराठा आणि मुस्लीम समाज आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर असल्यामुळे हा समाज शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात दुर्लक्षित होता. म्हणून मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे हे दोन्ही समाज आता आपला विकास साधू शकतील. शासनाने आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी बराच उशीर केला. यापूर्वीच हा निर्णय होणे अपेक्षित होते; परंतु देर आये दुरुस्त आये, असे म्हणत अकोल्यातील मराठा व मुस्लीम नेत्यांनी शासनाच्या या निर्णयाला गुरुवारी लोकमतच्या परिचर्चेत योग्य ठरविले. लोकमतच्यावतीने गुरुवारी ह्यमराठा व मुस्लीम समाजाला मिळालेले आरक्षण योग्य आणि आवश्यक आहे का?ह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत माजी मंत्री अजहर हुसेन, कुणबी विकास मंडळाचे मनोहर हरणे, मराठा महासंघाचे विनायक पवार, युवक काँग्रेसचे महेश गणगणे, मराठा सेवा संघाचे शरद वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. सरफराज खान, प्रा. प्रदीप वाघ, संभाजी ब्रिगेडचे पवन महल्ले, मराठा महासंघाचे योगेश थोरात आदी सहभागी झाले होते. सर्वच वक्त्यांनी मराठा व मुस्लीम आरक्षणाचे सर्मथन करताना आर्थिक निकषावर आधारित आरक्षणावर भर दिला. आरक्षणाला कोणी विरोध करण्याचे काही कारण नाही. आरक्षण दिल्यामुळे सर्व प्रश्न संपतील असेही नाही; परंतु आरक्षणाचे संरक्षण मिळाल्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो, असा विश्‍वास वक्त्यांनी व्यक्त केला. मुळात आरक्षणाची ओरड यापूर्वी एवढी नव्हती जेवढी आता आहे. मागील दहा वर्षात आरक्षणाचे फायदे दिसू लागल्यामुळे आरक्षण प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागले आहे. आरक्षण हा विषय सतत ज्वलंत राहणार आहे. मराठा आरक्षणाची चळवळ मागील ३२ वर्षांपासून सुरू आहे. त्यावर आता कुठे निर्णय झाला. ओबीसी नेत्यांच्या विरोधामुळे मराठा आरक्षणाचा विषय लांबणीवर पडला असा आरोप मराठा नेत्यांनी यावेळी केला. शिक्षण क्षेत्रात आणि नोकरीत आरक्षण आवश्यक आहे. यामुळे समाजाला प्रगती करणे सुकर होणार आहे, असा विश्‍वास वक्त्यांनी केला. आरक्षणाच्या बाबतीत युवक मात्र अनुकूल नाहीत. युवकांना आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही. युवकांना आर्थिक निकषावर आरक्षण अपेक्षित आहे, असाही विचार काही वक्त्यांनी मांडला. आरक्षणाला विरोध हा सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी असल्याचा आरोपदेखील वक्त्यांनी केला.