शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

धान्य साठय़ाला गोदाम क्षमतेचा अडसर

By admin | Updated: October 23, 2016 02:06 IST

हजारो क्विंटलचे वाटप झाले असून धान्य साठवायला जागाच उपलब्ध नाही!

अकोला, दि. २२- सार्वजनिक वितरण प्रणालीतून लाभार्थींना नियमित धान्य वाटपासाठी लागणारी साठवणुकीची क्षमता जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांच्या गोदामात नाही. त्यातच दरमहा धान्य वाटपाचे वेळापत्रकही पाळले जात नसल्याने ही समस्या गंभीर होत आहे. आता जिल्ह्यात आणखी ४८ हजारांपेक्षाही अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना धान्य वाटपासाठी पात्र केले जाणार आहे. त्यांच्या धान्य साठय़ाचीही मोठी अडचण निर्माण होणार आहे. राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू झाला. त्यावेळी लाभार्थींची संख्याही निश्‍चित झाली होती. त्यामध्ये ग्रामीण भागा तील एकूण शिधापत्रिकांच्या ७६ टक्के, तर शहरी भागात ४५ टक्के लाभार्थींना अन्नधान्यासाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित लाभार्थी एका झटक्यातच वंचित झाले.अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे फेब्रुवारी २0१४ पासून वंचित असलेल्या शिधापत्रिकाधारकांपैकी निवड करून त्यांना धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ४१,३२५, तर शहरी भागातून ७२0९ लाभार्थींना पात्र ठरविले जाणार आहे. ही निवड प्रक्रिया पुरवठा विभागाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना दरमहा वाटप करण्याइतके धान्य साठवणूक क्षमताच नाही. त्यामुळे महिन्याच्या काही दिवसांपर्यंत धान्य आणणे त्यानंतर वाटप करणे, हाच कार्यक्रम सुरू आहे. आता आणखी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू झाल्यानंतर दहा ते बारा हजार मे.टन धान्य दरमहा द्यावे लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी दीड ते दोन हजार मे.टन धान्य अतिरिक्त वाटप होणार आहे. ते धान्य कोठे साठवावे, ही समस्या पुरवठा विभागाकडे नव्याने निर्माण होणार आहे. एकाचवेळी साठा आणि वाटपाची घाईजिल्ह्यात सद्यस्थितीत चालू महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी त्याच महिन्यात उचल केली जाते. प्रत्यक्षात गोदामा त कोणत्याही वेळी दोन महिने वाटपाचा साठा उपलब्ध असावयास हवा. मात्र, जिल्ह्यात कोठेच ती परिस्थिती नाही. पातूर तालुक्यात दरमहा ८ ते ९ हजार मे.टन धान्य वाटप होते. तेथे केवळ तीन हजार मे.टन क्षमतेचे गोदाम आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात सात ते आठ हजार मे.टन धान्य वाटपासाठी चार ते पाच हजार मे.टन क्षमतेचे गोदाम आहेत. बाळापुरात आठ हजार मे.टन नियतनासाठी ५ हजार मे.टन क्षमतेचा गोदाम आहे. अकोट आणि तेल्हारा तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. मूर्तिजापूर तालुक्यासाठी गोदामाची क्षमता समाधानकारक आहे.