शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन बियाणे उगवले नाही; पीक विम्याची मदतही नाही

By admin | Updated: August 12, 2014 01:02 IST

हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली.

अकोला : पेरणीनंतर अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे उगवले नाही तसेच पीक विम्याची रक्कम व गारपिटीची मदत अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. अकोला तालुक्यात अनेक गावांमध्ये पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही, दुबार व तिबार पेरणी केल्यानंतरही बियाणे उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे उगवले नसलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचा सर्व्हे अद्यापही करण्यात आला नाही. तसेच पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकर्‍यांना मिळाली नसून, गेल्या फेब्रुवारीमध्ये गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या मदतीपासून अनेक गारपीटग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आ. डॉ. रणजीत पाटील, मनोज तायडे, प्रकाश भोंबळे, विनोद राऊत, पांडुरंग साबळे, ज्ञानेश्‍वर गावंडे, संतोष घोगरे,अरुण चौधरी, रावसाहेब साबळे, प्रमोद वाघमारे, दीपक वाघमारे, अरविंद तायडे, गजानन इंगळे, उत्तम सहारे, अनिल बोर्डे, संतोष भटकर, गजानन बोर्डे व इतर शेतकरी उपस्थित होते.