शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

परिपक्वतेपूर्वीच वाळले सोयाबीन!

By admin | Updated: October 3, 2014 01:32 IST

विदर्भातील शेतकर्‍यांवर संकटांची मालिका कायम

अकोला : विदर्भात कपाशीला मोठ्या प्रमाणात खो दिलेल्या सोयाबीनचे पीक परिपक्वतेपूर्वीच वाळल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोयाबीन पीक सध्या परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. सोयाबीनला यावेळीच पाण्याची नितांत गरज असते; परंतु यावर्षी पावसाचे आगमनच उशिरा झाले आणि बर्‍याच दिवसांपासून त्याने दडी मारली आहे. त्यातच तापमान प्रचंड वाढल्याने सोयाबीनचे पीक करपले आहे. चालू खरीप हंगामात सतत संकटाच्या मालिकेचा सामना करणार्‍या विदर्भातील शेतकर्‍यांनी आता या संकटापुढे हात टेकले आहेत.विदर्भात यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने, सर्वच खरीप पिकांची पेरणी उशिरा झाली. सोयाबीनची पेरणी तर पार ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबली. तसे हे पीक ऑक्टोबरमध्ये काढणीला येते; परंतु पेरणीला उशीर झाल्याने या पिकाचा काढणीचा हंगाम एक महिना पुढे गेला आहे. आता पावसाळा संपल्याने या पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे आणि वापशा (ऑक्टोबर हिट) मुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भातील १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन करपायला सुरुवात झाली आहे. शेंगा भरल्या नसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेत असताना, आता पीक जळत असल्याचे पाहून शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकर्‍यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)ने आंध्र प्रदेशात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली होती. राज्याच्या कृषी विभागाने राज्यातही तो प्रयोग केला खरा; परंतु तो फसल्यामुळे शेतकर्‍यांना यावर्षी पेरणीसाठी चांगले बियाणे मिळाले नाही. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनच्या पेरण्या उलटल्या. परिणामी शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. पेरणी केल्यानंतर सतत वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांना कीटकनाशकांची अतिरिक्त फवारणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सा पडला. सोयाबीनचे पीक साथ देईल, या आशेवर तो स्वप्न रंगवत होता; परंतु पावसाअभावी सोयाबीन काळवंडले असून, हजारो हेक्टरवरील हे पीक जळायला लागले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने अस्मानी संकटापुढे शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे.