शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

पेरण्या सुरू; उगवणीची मात्र धाकधूक

By admin | Updated: July 21, 2014 00:19 IST

आकोट तालुक्यातील शेतकरी संभ्रमावस्थेत

आकोट : तालुक्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली असून, सर्व पिकांची वेळ निघून गेल्याने निसर्गावर विश्‍वास ठेवून सोयाबीनचा पेरा करण्यात येत आहे. मात्र, सोयाबीन उगवणीबाबत बहुतांश शेतकरी साशंक असल्याने त्यांच्या धाकधूक वाढलेली आहे.यावर्षी पावसाचे येणे लांबल्याने पेरण्याही पुढे ढकलल्या गेल्या. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय होती ते कपाशी आणि सोयाबीन दोन्हीचा पेरा करून मोकळे झाले; परंतु नैसर्गिक पावसावर मदार असलेल्या कोरडवाहू पेरण्या मात्र पावसाअभावी खोळंबलेल्याच राहिल्या. यादरम्यान उडीद, ज्वारी आदी पिकांची वेळ निघून गेली आणि पावसाने काहीशी मेहेरबानी करण्यास सुरुवात केली; परंतु दमदार पावसाची सुरुवात झालीच नाही. त्यातही पाऊस सावत्रपणे वागला. कुठे दोन-तीनदा हलकासा तर कुठे बर्‍यापैकी चार-पाचदा बरसला. एवढय़ानेच हर्षभरीत झालेल्या कोरडवाहू शेतकर्‍यांनी पेरण्यांची लगबग सुरू केली. सर्व पिकांची वेळ निघून गेल्याने अनेकांनी सोयाबीनलाच पसंती दिली; परंतु सोयाबीनच्या उगवणशक्तीबाबत यावेळी खुद्द महाबीजनेच कानावर हात ठेवल्याने शेतकरी धास्तावलेलाच होता. पावसाच्या उदासीनतेमुळे सोयाबीनच्या उगवणशक्तीबाबत साशंकता असूनही शेतकर्‍यांनी यावेळी ह्यछातीला मातीह्ण लावण्याचे धाडस केले आहे. तालुक्याच्या उत्तरेकडील हरितपट्टय़ात धाडसाचे काम नाही. तिथे पाण्याची मुबलकता असल्याने पिके हमखास जोमदार राहतील; परंतु तालुक्याच्या दक्षिणेकडील खारपाणपट्टय़ाचा मोठा वांधा आहे. नैसर्गिक पाण्याविना हा पट्टा जगूच शकत नाही. अशा स्थितीत देवरीफाटा परिसरात चार-पाचदा बर्‍यापैकी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरा केला, करीत आहेत. मात्र, चोहोट्टा परिसरात मोठे धाकधुकीचे वातावरण आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे पेरावे की न पेरावे, अशी शेतकर्‍यांची संभ्रमावस्था आहे. त्यातच काही ठिकाणी पेरलेल्या सोयाबीनचे अंकूर अद्याप भूगर्भातून बाहेरच न आल्याने शेतकर्‍यांची धास्ती अधिकच वाढली आहे. काही बागायत शेतातही सोयाबीन उगवलेच नसल्याच्या वार्ता कानी पडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात अनामिक भीती निर्माण झालेली आहे. हे सोयाबीन न उगवण्यामागे दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत. त्यातील एक म्हणजे खरोखरच पेरलेल्या बियाण्याची उगवणशक्ती नष्ट झालेली असणे आणि दुसरे म्हणजे सोयाबीनच्या उगवणीसाठी हवी असलेली ओल शेतात नसणे.