शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

बोगस बियाणे विकणार्‍या कंपन्यांना जिल्हाबंदी करा!

By admin | Updated: August 5, 2014 01:05 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शासनाकडे शिफारस

अकोला- खरीप हंगामामध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे जिल्ह्यातील १५0 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकर्‍यांना अशाप्रकारे अडचणीत आणणार्‍या कंपन्यांना जिल्हय़ात बियाणे विक्री करण्यास प्रतिबंध करावा, अशी शिफारस करणारा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी घेण्यात आला. जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २ वाजता आयोजित स्थायी समिती सभेत शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी बोगस बियाण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. उगवणशक्ती नसलेले बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांमुळे जिल्हय़ातील शेतकरी नागवला जात आहे. अशा कंपन्यांच्याविरोधात शेतकर्‍यांना ग्राहक मंचशिवाय दुसरा पर्याय नसतो. आधीच आर्थिक संकटात सापडलेला अल्पभूधारक शेतकरी बोगस बियाणे निघाल्यानंतर कंपन्यांच्याविरोधात कायदेशीर लढाईसुद्धा लढू शकत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांना काळ्य़ा यादीत टाकून जिल्ह्यात बियाणे विक्री करण्यास बंदी करण्यात यावी, अशी शिफारस करणारा ठराव स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. हा ठराव पांडे गुरुजी यांनी मांडल्यानंतर त्याला भारिप-बमसंचे गटनेते विजय लव्हाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले. यासभेला अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, समाजकल्याण व महिला बालकल्याण सभापती आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)