शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाचाही होऊ शकतो विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:38 IST

अकोला : नागपूर ते मुंबई या ७0६ किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर ते मुंबई या ७0६ किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात आहे. हा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. याच मार्गाच्या बाजूने भविष्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोक्यात घोळत आहे. समृद्धी महामार्गालगत पेट्रोल, डीझेल व नैसर्गिक वायूच्या वाहिन्या, तसेच हाय स्पीड इंटरनेट केबल प्रस्तावित आहे. त्याच सोबत आताच भविष्यातील बुलेट ट्रेनसाठी तरतूद करून ठेवण्याचा विचार एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला होता.एचएसआरसीद्वारा प्रस्तावित मार्गावरून बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाल्यास,समृद्धी महामार्गाला समांतर बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न अर्धवट राहू शकते. समृद्धी महामार्गावर जालना ते नागपूर दरम्यान एकही मोठे शहर नसल्याने एचएसआरसीने मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर या मार्गास पसंती दिली असण्याची शक्यता आहे. खामगाव-जालना मार्गाचे स्वप्न साकार होऊ शकते!सन १९१० मध्ये इंग्रजांनी प्रस्तावित केलेला बुलडाण्यातील खामगाव- जालना हा रेल्वेमार्ग अजून कागदावरून ट्रॅकवर आलाच नाही. सन १९१२ मध्ये इंग्रजांनी या मार्गाला मान्यता दिल्यानंतर भूसंपादन झाले व १९२९ मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री येथे जीआयपी रेल्वे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट केसी रेल्वे कॅम्प या नावाने एक कार्यालय सुरू झाले. स्टेशनची गावे निश्चित झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत टाकण्याचे आवाहन झाले. इतकेच नव्हे, तर पिकांचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना पैसेही देण्यात आले. रेल्वेमार्गासाठी मातीचा भराव टाकून काम प्रगतीपथावर आले. करोडो रुपयांचे साहित्य येऊन पडले व त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने हे काम थंड बस्त्यात पडले ते आजतागायत. १९६३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली. ३६८ कोटी ८१ लाखांचा हा मार्ग होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला; मात्र दरम्यानच्या काळात १९९४ च्या सर्वेक्षणात हा मार्ग फिजीबल नसल्याचा शेरा अधिकाऱ्यांनी मारला व या मार्गाला कायमचा लाल सिग्नल बसला आहे. दरम्यान, खामगाव-जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बऱ्हाणपूर-सोलापूर या ४५० कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली. असे झाले तर खामगाव-चिखली-जालना असा ६० कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती; मात्र ही मागणीही थंड बस्त्यात पडल्याने आता बुलेट ट्रेनचा मार्ग याच जुन्या प्रस्तावित मार्गाने गेला तर शतकापासून प्रतीक्षा असलेला हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकतो.