शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
5
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
6
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
7
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
8
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
9
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
10
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
11
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
12
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
13
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
14
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
15
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
16
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
17
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
18
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
19
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
20
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाचाही होऊ शकतो विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:38 IST

अकोला : नागपूर ते मुंबई या ७0६ किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर ते मुंबई या ७0६ किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात आहे. हा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. याच मार्गाच्या बाजूने भविष्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोक्यात घोळत आहे. समृद्धी महामार्गालगत पेट्रोल, डीझेल व नैसर्गिक वायूच्या वाहिन्या, तसेच हाय स्पीड इंटरनेट केबल प्रस्तावित आहे. त्याच सोबत आताच भविष्यातील बुलेट ट्रेनसाठी तरतूद करून ठेवण्याचा विचार एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला होता.एचएसआरसीद्वारा प्रस्तावित मार्गावरून बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाल्यास,समृद्धी महामार्गाला समांतर बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न अर्धवट राहू शकते. समृद्धी महामार्गावर जालना ते नागपूर दरम्यान एकही मोठे शहर नसल्याने एचएसआरसीने मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर या मार्गास पसंती दिली असण्याची शक्यता आहे. खामगाव-जालना मार्गाचे स्वप्न साकार होऊ शकते!सन १९१० मध्ये इंग्रजांनी प्रस्तावित केलेला बुलडाण्यातील खामगाव- जालना हा रेल्वेमार्ग अजून कागदावरून ट्रॅकवर आलाच नाही. सन १९१२ मध्ये इंग्रजांनी या मार्गाला मान्यता दिल्यानंतर भूसंपादन झाले व १९२९ मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री येथे जीआयपी रेल्वे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट केसी रेल्वे कॅम्प या नावाने एक कार्यालय सुरू झाले. स्टेशनची गावे निश्चित झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत टाकण्याचे आवाहन झाले. इतकेच नव्हे, तर पिकांचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना पैसेही देण्यात आले. रेल्वेमार्गासाठी मातीचा भराव टाकून काम प्रगतीपथावर आले. करोडो रुपयांचे साहित्य येऊन पडले व त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने हे काम थंड बस्त्यात पडले ते आजतागायत. १९६३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली. ३६८ कोटी ८१ लाखांचा हा मार्ग होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला; मात्र दरम्यानच्या काळात १९९४ च्या सर्वेक्षणात हा मार्ग फिजीबल नसल्याचा शेरा अधिकाऱ्यांनी मारला व या मार्गाला कायमचा लाल सिग्नल बसला आहे. दरम्यान, खामगाव-जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बऱ्हाणपूर-सोलापूर या ४५० कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली. असे झाले तर खामगाव-चिखली-जालना असा ६० कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती; मात्र ही मागणीही थंड बस्त्यात पडल्याने आता बुलेट ट्रेनचा मार्ग याच जुन्या प्रस्तावित मार्गाने गेला तर शतकापासून प्रतीक्षा असलेला हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकतो.