शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटले, बाजार समित्या ओस!

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

शेतमाल उत्पादनात प्रचंड घट; आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटल सोयाबीनची आवक.

विवेक चांदूरकर / अकोलायावर्षी निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, पावसाने दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणार्‍या उलाढालीवर झाला आहे. आडातच नाही, तर पोहर्‍यात कोठून येणार?, या उक्तीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालांची आवक नगण्य आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत पावणे दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, यावर्षी आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटलची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अवघी १0 टक्के आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी मूग व उडिदाची अल्प क्षेत्रात पेरणी केली. त्यांची आशा सोयाबीनवर व पुढील पावसावर टिकून होती; मात्र संपूर्ण पावसाळ्या तच पाऊस कमी झाला, परतीचाही पाऊस बरसला नाही. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले, दाणाही बारीक राहिला. यावर्षी एकरी सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन झाले. काही शे तकर्‍यांना तर एकरी अवघे ४0 ते ५0 किलो उत्पादन झाले आहे. अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले. २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ २0 हजार क्विंटलचीच समितीत आवक झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही आवक पावणे दोन लाख क्विंटल होती. गत सहा दिवस म्हणजे २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान बाजार समिती बंद असतानाही सोमवारी केवळ पाच हजार क्विंटल सोयाबीन शेतकर्‍यांनी समितीत आणले. दररोज सरासरी दोन ते तीन हजार क्विंटलच आवक होत आहे. गतवर्षी याच मोसमात दरदिवशी १५ ते २0 हजार क्विंटल होत होती. यावर्षी सोयाबीनला २७00 ते ३१00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.