शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

उत्पादन घटले, बाजार समित्या ओस!

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

शेतमाल उत्पादनात प्रचंड घट; आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटल सोयाबीनची आवक.

विवेक चांदूरकर / अकोलायावर्षी निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, पावसाने दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणार्‍या उलाढालीवर झाला आहे. आडातच नाही, तर पोहर्‍यात कोठून येणार?, या उक्तीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालांची आवक नगण्य आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत पावणे दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, यावर्षी आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटलची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अवघी १0 टक्के आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी मूग व उडिदाची अल्प क्षेत्रात पेरणी केली. त्यांची आशा सोयाबीनवर व पुढील पावसावर टिकून होती; मात्र संपूर्ण पावसाळ्या तच पाऊस कमी झाला, परतीचाही पाऊस बरसला नाही. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले, दाणाही बारीक राहिला. यावर्षी एकरी सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन झाले. काही शे तकर्‍यांना तर एकरी अवघे ४0 ते ५0 किलो उत्पादन झाले आहे. अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले. २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ २0 हजार क्विंटलचीच समितीत आवक झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही आवक पावणे दोन लाख क्विंटल होती. गत सहा दिवस म्हणजे २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान बाजार समिती बंद असतानाही सोमवारी केवळ पाच हजार क्विंटल सोयाबीन शेतकर्‍यांनी समितीत आणले. दररोज सरासरी दोन ते तीन हजार क्विंटलच आवक होत आहे. गतवर्षी याच मोसमात दरदिवशी १५ ते २0 हजार क्विंटल होत होती. यावर्षी सोयाबीनला २७00 ते ३१00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.