शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, शेकडो हेक्टरवरील सोयाबीनच्या परिपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.

जुलै महिन्यात २३ ते २४ जुलै व सप्टेंबर महिन्यात ६ ते ७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली गेली होती. अतिवृष्टीमुळे

काही भागात नदीकाठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्ष्यांक होता, जवळपास हा लक्ष्यांक पूर्ण झाला असून, ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले होते. त्यात शेती खरडून गेल्याने अंतिम अहवालानुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ४४३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.

-----------------

कपाशीचा पेरा निम्म्याने घटला!

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता, त्यापेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तूर ११ हजार १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु, सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कपाशी या मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे.

--------------------------

हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती

अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही, तोच तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परिपक्व अवस्थेत असताना सुकत असल्याचे चित्र आहे. अज्ञात रोगामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेण्याची भीती आहे. सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

------------------

असा होता पीक पेरा

तूर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मूग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर, कापूस ६ हजार ८७२ हेक्टर.

---------------------------

माझ्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. मी यावर्षी सोयाबीन व तूर या पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन पीक ऐन परिपक्व अवस्थेत येत असतानाच अचानक शेतातील झाडाच्या शेंगा वाळल्या आहेत. यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले.

-दिलीप दुर्गे, शेतकरी, धामोरी.