शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, शेकडो हेक्टरवरील सोयाबीनच्या परिपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.

जुलै महिन्यात २३ ते २४ जुलै व सप्टेंबर महिन्यात ६ ते ७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली गेली होती. अतिवृष्टीमुळे

काही भागात नदीकाठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्ष्यांक होता, जवळपास हा लक्ष्यांक पूर्ण झाला असून, ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले होते. त्यात शेती खरडून गेल्याने अंतिम अहवालानुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ४४३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.

-----------------

कपाशीचा पेरा निम्म्याने घटला!

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता, त्यापेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तूर ११ हजार १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु, सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कपाशी या मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे.

--------------------------

हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती

अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही, तोच तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परिपक्व अवस्थेत असताना सुकत असल्याचे चित्र आहे. अज्ञात रोगामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेण्याची भीती आहे. सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

------------------

असा होता पीक पेरा

तूर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मूग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर, कापूस ६ हजार ८७२ हेक्टर.

---------------------------

माझ्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. मी यावर्षी सोयाबीन व तूर या पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन पीक ऐन परिपक्व अवस्थेत येत असतानाच अचानक शेतातील झाडाच्या शेंगा वाळल्या आहेत. यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले.

-दिलीप दुर्गे, शेतकरी, धामोरी.