शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:23 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, शेकडो हेक्टरवरील सोयाबीनच्या परिपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.

जुलै महिन्यात २३ ते २४ जुलै व सप्टेंबर महिन्यात ६ ते ७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली गेली होती. अतिवृष्टीमुळे

काही भागात नदीकाठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्ष्यांक होता, जवळपास हा लक्ष्यांक पूर्ण झाला असून, ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले होते. त्यात शेती खरडून गेल्याने अंतिम अहवालानुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ४४३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.

-----------------

कपाशीचा पेरा निम्म्याने घटला!

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता, त्यापेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तूर ११ हजार १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु, सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कपाशी या मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे.

--------------------------

हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती

अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही, तोच तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परिपक्व अवस्थेत असताना सुकत असल्याचे चित्र आहे. अज्ञात रोगामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेण्याची भीती आहे. सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

------------------

असा होता पीक पेरा

तूर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मूग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर, कापूस ६ हजार ८७२ हेक्टर.

---------------------------

माझ्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. मी यावर्षी सोयाबीन व तूर या पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन पीक ऐन परिपक्व अवस्थेत येत असतानाच अचानक शेतातील झाडाच्या शेंगा वाळल्या आहेत. यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले.

-दिलीप दुर्गे, शेतकरी, धामोरी.