शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ताळमेळ न घेताच लक्षावधींची कामे!

By admin | Updated: July 6, 2017 01:24 IST

१५ लाखांच्या मर्यादेची पडताळणीही नाही

अकोला : सक्षमीकरणाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांकडून ग्रामपंचायती सक्षम नसतानाही मर्यादेपेक्षा अधिक निधीची कामे दिल्या जातात. विशेष म्हणजे, कोणतीच पडताळणी न करताच ही कामे दिली जात असल्याने ग्रामपंचायतीसाठी कुरण मोकळे असल्याचा प्रकार घडत आहे.ग्रामीण भागात विविध कामे करण्यासाठी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या एकूण निधीपैकी किमान १५ टक्के निधी उरतो. हा निधी ग्रामनिधीत जमाच होत नसल्याचा प्रकार जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये घडत आहे.ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने २५ मार्च २०१५ रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला ‘एजन्सी’चा दर्जा देण्यात आला. त्यानुसार वार्षिक उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना १० ते १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्याचे ठरले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींनीच कायद्याने करणे बंधनकारक असलेली कामे (रोहयो- ५० टक्के), ग्रामपंचायतींनी करावयाची केंद्र शासनाच्या योजनेतील कामे, तसेच स्वनिधीतील कामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक सक्षम करणे, हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार कोणत्याही कामाच्या किमतीतून किमान १५ टक्के रक्कम संबंधित एजन्सी, कंत्राटदाराला मिळते. ग्रामपंचायतीकडे एजन्सी म्हणून असलेल्या कामांतून उरणारा १५ टक्के निधी कोठे जातो, याची कुणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीला एका वर्षात ६० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चाची कामे दिली जात नाहीत. ग्रामपंचायतीकडे कुठलाच तांत्रिक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हे बंधन आहे; मात्र विविध यंत्रणांकडून ही अट न पाहताच विविध कामे ग्रामपंचायत स्तरावर दिली जात आहेत. काम देताना ग्रामपंचायतीकडे त्या वर्षात इतर यंत्रणेकडून कोणते काम दिले आहे का, याची माहितीही घेतली जात नाही. त्यामुळेच मर्यादेचे उल्लंघन करून ग्रामपंचायतींना ६० लाखापेक्षाही अधिक रकमेची कामे देण्याचे प्रकार घडत आहेत.विविध विभागाकडून दिली जातात कामेआतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना वर्षभरात विविध यंत्रणांकडून कोट्यवधींची कामे देण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग, पाणीपुरवठा, लघुसिंचन, बांधकाम, समाजकल्याण आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना कामे देताना या विभागांनी पडताळणी करणे आवश्यक आहे.