शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

ताळमेळ न घेताच लक्षावधींची कामे!

By admin | Updated: July 6, 2017 01:24 IST

१५ लाखांच्या मर्यादेची पडताळणीही नाही

अकोला : सक्षमीकरणाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांकडून ग्रामपंचायती सक्षम नसतानाही मर्यादेपेक्षा अधिक निधीची कामे दिल्या जातात. विशेष म्हणजे, कोणतीच पडताळणी न करताच ही कामे दिली जात असल्याने ग्रामपंचायतीसाठी कुरण मोकळे असल्याचा प्रकार घडत आहे.ग्रामीण भागात विविध कामे करण्यासाठी यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या एकूण निधीपैकी किमान १५ टक्के निधी उरतो. हा निधी ग्रामनिधीत जमाच होत नसल्याचा प्रकार जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये घडत आहे.ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने २५ मार्च २०१५ रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला ‘एजन्सी’चा दर्जा देण्यात आला. त्यानुसार वार्षिक उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना १० ते १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्याचे ठरले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींनीच कायद्याने करणे बंधनकारक असलेली कामे (रोहयो- ५० टक्के), ग्रामपंचायतींनी करावयाची केंद्र शासनाच्या योजनेतील कामे, तसेच स्वनिधीतील कामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक सक्षम करणे, हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार कोणत्याही कामाच्या किमतीतून किमान १५ टक्के रक्कम संबंधित एजन्सी, कंत्राटदाराला मिळते. ग्रामपंचायतीकडे एजन्सी म्हणून असलेल्या कामांतून उरणारा १५ टक्के निधी कोठे जातो, याची कुणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीला एका वर्षात ६० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चाची कामे दिली जात नाहीत. ग्रामपंचायतीकडे कुठलाच तांत्रिक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हे बंधन आहे; मात्र विविध यंत्रणांकडून ही अट न पाहताच विविध कामे ग्रामपंचायत स्तरावर दिली जात आहेत. काम देताना ग्रामपंचायतीकडे त्या वर्षात इतर यंत्रणेकडून कोणते काम दिले आहे का, याची माहितीही घेतली जात नाही. त्यामुळेच मर्यादेचे उल्लंघन करून ग्रामपंचायतींना ६० लाखापेक्षाही अधिक रकमेची कामे देण्याचे प्रकार घडत आहेत.विविध विभागाकडून दिली जातात कामेआतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना वर्षभरात विविध यंत्रणांकडून कोट्यवधींची कामे देण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग, पाणीपुरवठा, लघुसिंचन, बांधकाम, समाजकल्याण आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना कामे देताना या विभागांनी पडताळणी करणे आवश्यक आहे.