शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ाला आता संशोधन केंद्राचे ‘सलाईन’!

By admin | Updated: February 18, 2015 01:15 IST

अकोल्यात होणार संशोधन केंद्र : सहा तालुक्यांच्या आशा पल्लवित.

बुलडाणा : पश्‍चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ात येणार्‍या ८९२ गावांना या शापातुन मुक्त करण्यासाठी आतापर्यंत विविध योजना राबविण्यात आल्या असून आता स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. हे केंद्र अकोला येथे सुरू होणार असल्याने या भागातील प्रश्नांची तड लागण्याची शक्यता निर्माण झाली असुन त्यामुळे बुलडाण्यातील २५६ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शापित खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राच्या प्रस्तावावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर) परिषदेने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. या संशोधन केंद्रामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कृषी विद्यापीठात होऊ घातलेल्या या क्षारपड जमिन संशोधन केंद्रामध्ये सिंचन व पाणी या दोन प्रश्नांसह मानवी आरोग्याचाही विचार प्रामुख्याने केला जावा अशी अपेक्षा या परिसरातुन व्यक्त होत आहे. चांगली व सुपीक जमीन सुद्धा या खारपाणपटयामुळे निकृष्ट होत असल्याने सिंचनाचा प्रश्न बिकट बनला आहे. सध्या या परिसरात १४0 गाव पाणीपुरवठा योजना आकारास येत असुन ही योजना पुर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असला तरी सिंचनासाठी ठोस अशी उपाययोजना तसेच पीक पद्धतीत बदल या दृष्टीनेही संशोधन होण्याची गरज आहे.

*किडनी आजाराच्या मृत्यूने गाठले दीड शतक

जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, नांदूरा व मलकापूर या सहा तालुक्यांना बसलेला खारपाणपट्टा विळखा हा मोठा शाप असून हा पट्टा मृत्यूचा पाश बनला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये गेल्या ७ वर्षात १५३ व्यक्ती किडनी विकाराने दगावल्या असल्याचे निष्पन्न झाले असून सद्यस्थितीत ५00 च्या वर रूग्ण किडनी स्टोनने आजारी असल्याचे समोर आले आहे.

*खारपाण पट्ट्यातील पाणी दूषित असून ते पिण्याने किडणीचे आजार व कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात.या परिसरात किडणी तसेच पोटाचे विकार वाढले आहेत. वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. *या खारपाणपट्टय़ातील माती चोपण असून, पिण्याचे पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषिमाल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतो. *खारपाण पट्ट्यातील पाण्याचे डॉ. हिम्मतराव बावस्कार यांनी नमुने घेतले होते.या चाचणीत पाण्यात शरीरास घातक कॅडमियन, पी.पी एम आर्सनिक व कॉपर निल सारखी रासायनिक घटक आढळून आले होते.