शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडली

By admin | Updated: July 29, 2014 20:18 IST

दोन दिवसात कोसळलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडीच नव्हे, तर शेतजमीनसुद्धा वाहून नेली आहे.

आकोट: आकोट तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. दोन दिवसात कोसळलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडीच नव्हे, तर शेतजमीनसुद्धा वाहून नेली आहे. नदी-नाल्यामधून वाहणार्‍या पाण्याने शेतीमार्गाने वाट काढल्याने शेतीचे नाल्यामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून, मानसिक मनोबल खचले असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.आकोट तालुक्यात ४0 हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये पडीत जमीन क्षेत्र ४00 हेक्टर आहे. त्यापैकी वाहतीमध्ये असलेली शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाच्या पुरात वाहून गेली आहे. आकोट-तेल्हारा मार्गावरील ५२ नदी-नाल्यांच्या काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पठार, मोहाळी, खार, चंद्रिका, लेकरूवाडी यासह इतर नदी-नाल्याकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.नदी-नाल्यामधील झाडेझुडपे काढण्यात आली नाही. त्यामुळे वाहत्या पाण्याला मार्ग मिळाला नसल्याने शेतीमध्ये पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीमधील मातीसुद्धा वाहून गेली आहे. त्यामुळे शेतीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुन्हा पेरणीकरिता जमिनीची मशागत करणे अशक्य झाले आहे. अनेक गावांमधील शेतकर्‍यांची पिके वाहून गेली. तर पाऊस थांबताच काळी म्हैस म्हणून ओळख असलेल्या कीटकांनी पर्‍हाटीचे शेत खल्लास करणे सुरू केले आहे. सोयाबीन पिकांचा तर गर्भातच मृत्यू झाला आहे. पावसाने सोयाबीन उगवण्यापूर्वी शेतीजमीन वाहून नेली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांनी पेरणी धरण्याआधीच पुरामुळे शेतात खड्डे पडल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. खारपाणपट्टय़ातील मधुकर गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंडे गोपाल गावंडे यांची शेती चांगलीच खरडून गेली आहे. सारंगधर गुरुजी, सुरेश गावंडे, प्रवीण गावंडे,विनोद वाघोडे यांच्यासह शेतकर्‍यांचे सोयाबीन पीक धोक्यात आले. प्रकाश गावंडे,चंदू तायडे यांच्यासह खारपाणपट्टय़ातील शेकडो शेतकर्‍यांच्या पर्‍हाटीचे नंबरचे नंबर खल्लास झाले आहेत. बाबाराव वाकोडे, लुणकरण डागा,गणेश कराड, रवींद्र बानेरकर, डिगांबर नागरे यांचेही मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे आधीच पाऊस वेळेवर न आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. उशिरा पाऊस आल्याने पीक उगवण व उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. महागडे बी-बियाणे पेरणी केल्यावर पर्‍हाटीवर कीटकांनी, सोयाबीनवर हरणांनी हल्ला चढविला, तर उगवलेल्या पिकांची रानडुकरांनी नासधूस केली आहे. शिवाय दोन दिवस धो-धो पाऊस झाल्याने पिकासह शेतजमीन वाहून गेली. त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकला असून, आर्थिक अडचणीने हतबल झाला आहे.