शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पूर्णेला पूर, जनजीवन विस्कळीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

पूर्णेच्या पुलावरून २२ फूट पाणी: अकोला-अकोट, अकोट-शेगाव, तेल्हारा-वरवट-शेगाव मार्ग बंद अकोला: जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने ...

पूर्णेच्या पुलावरून २२ फूट पाणी: अकोला-अकोट, अकोट-शेगाव, तेल्हारा-वरवट-शेगाव मार्ग बंद

अकोला: जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने दुसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम होती. पूर्णेला पूर आल्याने जिल्ह्यातील तीन प्रमुख मार्ग बंद होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर काही प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, गांधीग्राम येथे बुधवारी सकाळच्या सुमारास पूर्णेच्या पुलावरून तब्बल २२ फूट पाणी वाहत होते. सायंकाळपर्यंत पाणी ओसरले होते, मात्र वाहतूक पूर्णपणे बंद होती.

--------------------------------------------------अंदुरा: पुरामुळे ६० प्रवासी अडकले! अंदुरा: बाळापूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. अंदुरा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने अकोट-शेगाव मार्ग, तेल्हारा-अकोला मार्ग, तेल्हारा-बाळापूर मार्गावरील वाहतूक बंद होती. दरम्यान, या मार्गाने प्रवास करणारे ५० ते ६० प्रवासी अडकून पडले होते, तर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

--------

शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली !

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अंदुरा परिसरातील पूर्णा नदी, मोर्णा नदी, पानखास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, या पुरामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अगोदरच दुबार, तिबार पेरणी केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पूर परिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

----------

ग्रामस्थांच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरळीत

अंदुरा येथील पूर्णा, मोर्णा व पानखास नदीला आलेल्या पुरात विद्युत खांब उखडून पडले असल्याने अंदुरा येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. सरपंच पती गणेश बेंडे यांनी वायरमनशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मदतीने विद्युत खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत केला. यावेळी गावातील भिकाजी वानखडे, गंगाधर आमझरे, गोपाल वराळे, महेश सांगोळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

------------------------

ग्रामस्थांचा पुढाकार; प्रवाशांची केली भोजनाची व्यवस्था

अंदुरा येथील नद्यांना पूर आल्याने आकोट - शेगाव, तेल्हारा - अकोला, तेल्हारा - बाळापूर मार्गे जाणारे प्रवासी ताटकळत उभे होते. अशा प्रवाशांची भोजन व्यवस्था हनुमान मंदिर परिसरात ज्ञानदेव ठोकणे, सुरेश कड, राजू गिर्हे आदी नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या गावातील विश्वनाथ बदर्के, सोपान कड, विजय बावणे शंकर नवथळे, तुषार ताथूरकार, मांगुळकार, बोरवार आदी ग्रामस्थांनी मदत केली.