शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पूर्णेला पूर, जनजीवन विस्कळीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

पूर्णेच्या पुलावरून २२ फूट पाणी: अकोला-अकोट, अकोट-शेगाव, तेल्हारा-वरवट-शेगाव मार्ग बंद अकोला: जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने ...

पूर्णेच्या पुलावरून २२ फूट पाणी: अकोला-अकोट, अकोट-शेगाव, तेल्हारा-वरवट-शेगाव मार्ग बंद

अकोला: जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर कायम असल्याने दुसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम होती. पूर्णेला पूर आल्याने जिल्ह्यातील तीन प्रमुख मार्ग बंद होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर काही प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, गांधीग्राम येथे बुधवारी सकाळच्या सुमारास पूर्णेच्या पुलावरून तब्बल २२ फूट पाणी वाहत होते. सायंकाळपर्यंत पाणी ओसरले होते, मात्र वाहतूक पूर्णपणे बंद होती.

--------------------------------------------------अंदुरा: पुरामुळे ६० प्रवासी अडकले! अंदुरा: बाळापूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. अंदुरा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने अकोट-शेगाव मार्ग, तेल्हारा-अकोला मार्ग, तेल्हारा-बाळापूर मार्गावरील वाहतूक बंद होती. दरम्यान, या मार्गाने प्रवास करणारे ५० ते ६० प्रवासी अडकून पडले होते, तर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

--------

शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली !

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अंदुरा परिसरातील पूर्णा नदी, मोर्णा नदी, पानखास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, या पुरामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अगोदरच दुबार, तिबार पेरणी केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पूर परिस्थितीची पाहणी व सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

----------

ग्रामस्थांच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरळीत

अंदुरा येथील पूर्णा, मोर्णा व पानखास नदीला आलेल्या पुरात विद्युत खांब उखडून पडले असल्याने अंदुरा येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. सरपंच पती गणेश बेंडे यांनी वायरमनशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मदतीने विद्युत खांब उभा करून वीजपुरवठा सुरळीत केला. यावेळी गावातील भिकाजी वानखडे, गंगाधर आमझरे, गोपाल वराळे, महेश सांगोळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

------------------------

ग्रामस्थांचा पुढाकार; प्रवाशांची केली भोजनाची व्यवस्था

अंदुरा येथील नद्यांना पूर आल्याने आकोट - शेगाव, तेल्हारा - अकोला, तेल्हारा - बाळापूर मार्गे जाणारे प्रवासी ताटकळत उभे होते. अशा प्रवाशांची भोजन व्यवस्था हनुमान मंदिर परिसरात ज्ञानदेव ठोकणे, सुरेश कड, राजू गिर्हे आदी नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या गावातील विश्वनाथ बदर्के, सोपान कड, विजय बावणे शंकर नवथळे, तुषार ताथूरकार, मांगुळकार, बोरवार आदी ग्रामस्थांनी मदत केली.