लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतीवर असलेले पीक, शेती यांत्रिकीकरण आणि शैक्षणिक उद्देशासाठी घेतलेले कर्ज माफ व्हावे, तसेच नवीन कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात किमान ५० हजार रुपये जमा करावे, यासह विविध मागण्यांचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना दिलेल्या निवेदनानुसार सदस्या प्रतिभा अवचार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. सर्वसाधारण सभेत इतरही ठरावासोबत निवेदनातील संपूर्ण मुद्यांचा ठराव मंजूर करत तो प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठवण्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सरसकट शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे. त्यामध्ये पीक कर्ज, शेती अवजारे, यंत्र सामग्री, ट्रॅक्टर व इतर कर्ज, पाइपलाइन, मोटर, स्प्रिंकलर किंवा ठिबक, विहीर, शेततळे, सिंचनाच्या सोयीसाठी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे माफ करावी, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक, पतसंस्था, एनबीएफसी, अधिकृत सावकारी कर्जाचा समावेश असावा, खारपाणपट्ट्यातील सर्वच गावांचा त्यामध्ये समावेश झालाच पाहिजे. २०१७ पर्यंत थकलेले सर्व कर्ज, नियमित असलेल्या शेतकऱ्यांना पतपुरवठा किमान ५० टक्के वाढवून देणे, कर्ज माफीचा आदेश २१ जूनपूर्वी द्यावा, नवीन कर्ज वाटपासाठी किमान ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, सोने तारण कर्जासाठी कार्यक्षेत्राची अट ठेवू नये, शेतीवर असलेले शैक्षणिक कर्ज, उच्च शिक्षणाचे तसेच वैद्यकीय खर्चासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागण्या आहेत. या कर्जमाफीला विरोधशेतकरी जागर मंचाने दिलेल्या निवेदनात कर्ज माफीच्या मागणीसोबत काही बाबीला विरोधही केला आहे. त्यामध्ये सरकारी नोकरदार शेतकरी, घरबांधणीसाठी शेतीवर घेतलेले कर्ज, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वाहन खरेदीसाठी घेतलेले कर्ज माफ करू नये, असेही ठरावात नमूद करण्यात आले.
सरसकट कर्जमाफीचा ठराव
By admin | Updated: June 15, 2017 01:31 IST