शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

बाप रे! कागदपत्र गाेळा करतानाच दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहे. ...

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहे. शपथपत्र, हमीपत्र, स्वयंघोषणापत्रासाठी साधा कागद की मुद्रांक वापरावा, यावरूनही उमेदवारांमध्ये संभ्रम असल्याने त्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आता सर्वत्र निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी माहितीपत्रक लावण्यात आले. त्यामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी आहे. त्या यादीत उल्लेख करताना शपथपत्र, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र असे उल्लेख आहेत. त्यापैकी कोणता पुरावा साध्या कागदावर द्यावा किंवा मुद्रांकावर हवा, याबाबत कुठेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे काही उमेदवार सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकावर ते सर्व सादर करीत आहेत, तर काही उमेदवार साध्या कागदावरच देत आहेत. त्यामुळे या दोन्ही पद्धतीत कोण चूक किंवा कोण बरोबर हे स्पष्ट होत नाही. त्यातच छाननीमध्ये कोणाचा अर्ज बाद ठरेल, हेही त्यामुळे स्पष्ट होऊ शकत नाही. त्यातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या बाबींची स्पष्टता होत नसल्याने गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

- नामनिर्देशन पत्रासोबत लागणारी कागदपत्रे

ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, दोनपेक्षा अधिक अपत्ये नसल्याचे प्रमाणपत्र, विवाहित महिलेला माहेरचे आणि सासरच्या नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र, कोणताही गुन्हा दाखल किंवा शिक्षा झाली नसल्याचे शपथपत्र, जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत उपलब्ध करून देणार असल्याचे हमीपत्र, नावे असलेली संपत्ती, मालमत्तेचे घोषणापत्र या कागदपत्रांचा समावेश आहे. त्यातच राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना समितीपुढे सादर करण्यासाठी वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, दावा केलेल्या जातीचे पुरावे जोडत असल्याचे शपथपत्रही द्यावे लागते. शौचालय प्रमाणपत्र ग्रामपंचायतीच्या ठरावासह जोडायचे आहे. ही सर्व कागदपत्रे देताना नेमकी कोणत्या मुद्रांकावर व कोणत्या साध्या कागदावर याबाबत उमेदवारांचा प्रचंड गोंधळ होत आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रच केवळ १०० रुपयांच्या मुद्रांकावर द्यावे लागते, असे सांगण्यात आले आहे.

- सातवी उत्तीर्णतेचीही अट

५ मार्च २०२० रोजीच्या अधिनियमानुसार जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीला निवडणूक लढण्यासाठी सातवी उत्तीर्णतेची अट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्ती आता सातवी उत्तीर्ण नसेल तर तिला निवडणूक लढता येणार नाही. हे विशेष.

- सुटीच्या दिवशीही जातवैधता अर्ज स्वीकारणार

निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांचे ऑफलाइन अर्ज २५, २६, २७ या सुटीच्या दिवशीही स्वीकारले जातील, असे बुलडाणा जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी कळवले आहे.