शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

शेतकरी संपावर जाणार!

By admin | Updated: May 30, 2017 20:07 IST

३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. शासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा किसान क्रांती प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. लागवडीचा खर्च निघेनासा झाला आहे. शासनाचे धोरण कळायला मार्ग नाही. विदेशातून धान्य, कडधान्य आयातीचे प्रकार सुरू आहेत. फळे, भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे, त्यामुळे ३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. कर्जमुक्ती व हमीभाव घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा देत किसान क्रांती प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांनी शासनावर सडकून टीका केली. निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मग आता भाजप शासन कर्जमुक्तीबाबत विधानसभेत कर्जमुक्तीचा ठराव का मांडत नाही. सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, दुधाला ५० रुपये लिटर हमीभाव, मोफत ठिबक सिंचन, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करून वीज बिल माफ करा, आदी मागण्यांसाठी शेतकरी संपावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात दूध व भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येणार असून, इतर राज्यातून होणारा पुरवठादेखील थांबविला जाणार आहे. प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मत्रीपद सोडून सदाभाऊ खोत आमच्यासोबत आले तर त्यांना सोबत घेऊ. या पत्रकार परिषदेला डॉ. श्रीकांत तिडके, अरुण बोंडे, सुरेश जोगळे, राजू पाटील वानखडे, प्रकाशअण्णा बोनगिरे, देवीदास बांगड, पुंडलीकराव भारंबे, प्रा. पी. एम. पाटील, प्रा. सुधाकर गौरखेडे उपस्थित होते.