शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शेतक-यांना मुलामुलींचे शिक्षण, लग्न खर्चाची चिंता!

By admin | Updated: November 29, 2014 22:05 IST

नापिकीमुळे आर्थिक संकट: वाट कशी काढणार?

संतोष येलकर/अकोलापावसाचे उशिरा झालेले आगमन, त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, गरज असताना पावसाने मारलेली दडी अन् गरज नसताना काही भागांमध्ये झालेली अतवृष्टी, या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या लहरीपणाची प्रचिती देत, निसर्गाने यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीची पिकांनाही जबर तडाखा दिल्याने, राज्यातील शेतकरी पुरता कोलमडला असून, त्याला मुलामुलींचे शिक्षण, विवाहादी खर्चाची चिंता भेडसावू लागली आहे. राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या सहा महसूली विभागांतर्गत जिल्ह्यांमधील एकूण ३९,४३४ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १९,0५९ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातल्या सर्वच म्हणजेच ७, २४१ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील २,0२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील एकूण १९,0५९ गावांमध्ये पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत संसाराचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक संकटातून वाट कशी काढावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. राज्य शासनाने ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९,0५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली असून, त्या गावांसाठी वेगवेगळ्या सवलती लागू करण्यासही मंजूरी दिली आहे. त्यानुसार शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असले तरी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी येणारा खर्च, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च, तसेच मुला-मुलींचे विवाह यासाठी येणारा खर्च कसा भागविणार, ही चिंता दुष्काळी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांना सतावत आहे.अमरावती विभागातील जिल्हानिहाय टंचाईसदृश गावे!जिल्हा गावेअमरावती            १९८१अकोला                  ९९७यवतमाळ             २0५0बुलडाणा               १४२0वाशिम                   ७९३............................एकूण                    ७२४१