शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शेतक-यांना मुलामुलींचे शिक्षण, लग्न खर्चाची चिंता!

By admin | Updated: November 29, 2014 22:05 IST

नापिकीमुळे आर्थिक संकट: वाट कशी काढणार?

संतोष येलकर/अकोलापावसाचे उशिरा झालेले आगमन, त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, गरज असताना पावसाने मारलेली दडी अन् गरज नसताना काही भागांमध्ये झालेली अतवृष्टी, या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या लहरीपणाची प्रचिती देत, निसर्गाने यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीची पिकांनाही जबर तडाखा दिल्याने, राज्यातील शेतकरी पुरता कोलमडला असून, त्याला मुलामुलींचे शिक्षण, विवाहादी खर्चाची चिंता भेडसावू लागली आहे. राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या सहा महसूली विभागांतर्गत जिल्ह्यांमधील एकूण ३९,४३४ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १९,0५९ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातल्या सर्वच म्हणजेच ७, २४१ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील २,0२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील एकूण १९,0५९ गावांमध्ये पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत संसाराचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक संकटातून वाट कशी काढावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. राज्य शासनाने ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९,0५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली असून, त्या गावांसाठी वेगवेगळ्या सवलती लागू करण्यासही मंजूरी दिली आहे. त्यानुसार शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असले तरी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी येणारा खर्च, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च, तसेच मुला-मुलींचे विवाह यासाठी येणारा खर्च कसा भागविणार, ही चिंता दुष्काळी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांना सतावत आहे.अमरावती विभागातील जिल्हानिहाय टंचाईसदृश गावे!जिल्हा गावेअमरावती            १९८१अकोला                  ९९७यवतमाळ             २0५0बुलडाणा               १४२0वाशिम                   ७९३............................एकूण                    ७२४१