शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

गरजेपेक्षा जास्त पाणीही आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होते; तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला अपायकारक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा ...

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होते; तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला अपायकारक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाणी प्राशन करावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

कोणी किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

० ते ६ महिने : आवश्यकता नाही

६ महिने ते १ वर्षे : २५० मिलिलिटर

१ ते ३ वर्ष : १ लिटर

४ ते ८ वर्षे : १.२ लिटर

९ ते १३ वर्षे : १.८ लिटर

१४ ते १८ वर्षे : ३ लिटर

१८ वर्षावरील : ४ लिटर

शररीराला पाणी कमी पडले तर ...

शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले तर डोके दुखणे, चक्कर येणे, डी-हायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशन होऊन मूत्रपिंडावर परिणाम होतो.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

शरीराला गरज भासते तेव्हा मेंदू तहान लागल्याचा संदेश पाठवतो. नॉर्मल मनुष्य चार लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतो. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढू शकते. किडणी, हृदयविकार व सोडियमची कमतरता असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण निश्चित करावे.

- डॉ. आनंद शर्मा, युरॉलॉजिस्ट, अकोला

निरोगी शरीरासाठी दिवसातून ३ ते ४ लिटरदरम्यान पाणी पुरेसे आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी प्राशन केले तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.