शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गरजेपेक्षा जास्त पाणीही आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होते; तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला अपायकारक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा ...

आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होते; तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला अपायकारक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाणी प्राशन करावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

कोणी किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)

० ते ६ महिने : आवश्यकता नाही

६ महिने ते १ वर्षे : २५० मिलिलिटर

१ ते ३ वर्ष : १ लिटर

४ ते ८ वर्षे : १.२ लिटर

९ ते १३ वर्षे : १.८ लिटर

१४ ते १८ वर्षे : ३ लिटर

१८ वर्षावरील : ४ लिटर

शररीराला पाणी कमी पडले तर ...

शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले तर डोके दुखणे, चक्कर येणे, डी-हायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशन होऊन मूत्रपिंडावर परिणाम होतो.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

शरीराला गरज भासते तेव्हा मेंदू तहान लागल्याचा संदेश पाठवतो. नॉर्मल मनुष्य चार लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतो. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढू शकते. किडणी, हृदयविकार व सोडियमची कमतरता असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाण्याचे प्रमाण निश्चित करावे.

- डॉ. आनंद शर्मा, युरॉलॉजिस्ट, अकोला

निरोगी शरीरासाठी दिवसातून ३ ते ४ लिटरदरम्यान पाणी पुरेसे आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी प्राशन केले तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.