शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

तपासातील त्रुटी लाचखोरांच्या पथ्यावर

By admin | Updated: September 21, 2014 22:53 IST

५४ जणांना शिक्षा : १२३ प्रकरणांमधील आरोपी निर्दोष.

अकोला : लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा लाचखोरांच्या प थ्यावर पडत असल्याचे चित्र शिक्षेच्या अल्प प्रमाणावरून पहावयास मिळते. चालू वर्षात आतापर्यंत राज्यात एकूण १७७ खटले चालविण्यात आले. त्यापैकी केवळ ५४ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, १२३ खटल्यांमधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.शासकीय-निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर कारवाईच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर आहे. अलिकडच्या काळात या विभागाने धडाक्यात कारवाया केल्या.मात्र भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई केल्यानंतर, तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा आरोपींसाठी फायद्याच्या ठरत आहे. लाचखोरीच्या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक असते. वरिष्ठ अधिकारी तपासामध्ये त्रुटी असल्यास दुरुस्त करता त. प्रसंगी विधी विभागाचा सल्लाही घेतात. नंतरच दोषारोपपत्र दाखल करण्यास वरिष्ठांकडून मंजुरी दिली जाते. लाचखोरांसाठी सापळा रचताना शासकीय कर्मचार्‍यांना पंच म्हणून सोबत घेतले जाते. न्यायालयात पंच फितूर होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. तरी लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परिक्षेत्र                     शिक्षेची टक्केवारीमुंबई                               ११%ठाणे                                0६ %पूणे                                 0२%नाशिक                             1२%नागपूर                             0९%अमरावती                         0३%औरंगाबाद                         0८%नांदेड                                0३%