शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अवकाळी पावसाचा हळद पिकाला फटका

By admin | Updated: April 10, 2016 01:34 IST

व-हाडातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

वाशिम: वर्‍हाडात उन्हाळी पीक म्हणून हळदीचे उत्पादन घेतले जाते; मात्र गत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने या पिकाचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना फटका बसला आहे. अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांमध्ये कपाशी व सोयाबीन पिकाला फाटा देत, नवनवीन पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. कपाशीच्या उत्पादनात झालेली घट आणि सोयाबीनचे किडींमुळे होणारे नुकसान, यामुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. फळबागांसाठी जास्त पाण्याची गरज असते. सध्या पाणीटंचाई असल्यामुळे पाण्याची कमी गरज असलेल्या हळद पिकाकडे शेतकरी वळले आहेत. ठिबक सिंचन, ड्रीपद्वारे पाणी देऊन कमी पाण्यामध्ये हळदीचे विक्रमी उत्पन्न शेतकरी घेत आहेत. यावर्षी हळदीचे पीक बहरले असतानाच मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा हळदीचे पीक काढणीवर आले असताना, अवकाळी पाऊस झाला. पावसासोबतच काही भागात गारपीटही झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. हजारो शेतकर्‍यांनी हळद काढून सुकण्यासाठी शेतात ठेवली होती. अशातच सात एप्रिल रोजी रात्री ९ ते १0 वाजताच्या दरम्यान अचानक पाऊस झाला. मालेगावसह काही तालुक्यांमध्ये गारपीटही झाली. त्यामुळे सुकण्यासाठी ठेवलेली हळद ओली झाली. त्यामध्ये मातीही मिसळली गेली. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला हळदीचे उत्पादन राज्यातील सांगली, यानंतर मराठवाड्यातील वसमत, नांदेड या जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. गत काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन वर्‍हाडातील शेतकरी घ्यायला लागले; मात्र अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.