शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

अवकाळी पावसाचा हळद पिकाला फटका

By admin | Updated: April 10, 2016 01:34 IST

व-हाडातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

वाशिम: वर्‍हाडात उन्हाळी पीक म्हणून हळदीचे उत्पादन घेतले जाते; मात्र गत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने या पिकाचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना फटका बसला आहे. अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांमध्ये कपाशी व सोयाबीन पिकाला फाटा देत, नवनवीन पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. कपाशीच्या उत्पादनात झालेली घट आणि सोयाबीनचे किडींमुळे होणारे नुकसान, यामुळे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहेत. फळबागांसाठी जास्त पाण्याची गरज असते. सध्या पाणीटंचाई असल्यामुळे पाण्याची कमी गरज असलेल्या हळद पिकाकडे शेतकरी वळले आहेत. ठिबक सिंचन, ड्रीपद्वारे पाणी देऊन कमी पाण्यामध्ये हळदीचे विक्रमी उत्पन्न शेतकरी घेत आहेत. यावर्षी हळदीचे पीक बहरले असतानाच मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा हळदीचे पीक काढणीवर आले असताना, अवकाळी पाऊस झाला. पावसासोबतच काही भागात गारपीटही झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. हजारो शेतकर्‍यांनी हळद काढून सुकण्यासाठी शेतात ठेवली होती. अशातच सात एप्रिल रोजी रात्री ९ ते १0 वाजताच्या दरम्यान अचानक पाऊस झाला. मालेगावसह काही तालुक्यांमध्ये गारपीटही झाली. त्यामुळे सुकण्यासाठी ठेवलेली हळद ओली झाली. त्यामध्ये मातीही मिसळली गेली. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला हळदीचे उत्पादन राज्यातील सांगली, यानंतर मराठवाड्यातील वसमत, नांदेड या जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. गत काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन वर्‍हाडातील शेतकरी घ्यायला लागले; मात्र अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.