शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

निधीअभावी अटल अर्थसहाय्य योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गावातील शेतकरी सभासदांना शेती कर्जे देण्याचे माध्यम म्हणून सध्या संस्था काम करतात. त्यांच्या वसुलीवर ...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गावातील शेतकरी सभासदांना शेती कर्जे देण्याचे माध्यम म्हणून सध्या संस्था काम करतात. त्यांच्या वसुलीवर या संस्थांना मोबदला मिळतो. एवढ्यावरच या संस्था टिकून आहेत.

ग्रामीण विकासास साहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषिपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, शेतमाल उत्पादनातून शेतकऱ्यांचा नफा वाढविण्यासाठी तसेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागात शेतमालावर प्रक्रिया व विक्री करावी, यास प्रोत्साहन, शेतकरी ते ग्राहक यामध्ये असणारी मूल्य साखळी कमी करावी. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. ही योजना २०१८-२०१९ मध्ये राबविण्यात येणार होती. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने अकोला जिल्ह्यासाठी ९ कोटी ६६ लाख रुपये मंजूर केले होते. याकरिता जिल्ह्यातील ३४ संस्थांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पाठविण्यात आले. तीन वर्षे होऊनही या योजनेला अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे ही योजना थंडबस्त्यात पडली आहे.

--कोट--

कार्यालयाकडे ३४ प्रस्ताव आहेत. सर्व प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी महामंडळ पुणे येथे सादर करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही.

विनायक पाहायकर, जिल्हा उपनिबंधक

--बॉक्स--

प्रत्येक संस्थेला मिळणार होते ४० लाख

एकूण प्रकल्प किंमत ४० लाख रुपये देऊन मिळणार होते. ७५ टक्के अनुदान तर उर्वरित १२.५० टक्के महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून सहकारी संस्थांना कर्ज म्हणून दिले जाणार होते.