शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

यंदाही दुष्काळाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:41 IST

पावसाची दांडी : केवळ ५३ टक्के पेरण्या; पिके धोक्यात

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने गत पंधरा दिवसांपासून दांडी मारल्याने, जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उगवलेली पिकेही सार्वत्रिक दमदार पावसाअभावी धोक्यात आली आहेत. त्यामुळे वर्षभरानंतर यंदाही जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. जूनमध्ये अधून-मधून रिमझिम बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या; परंतु गत २ जुलैनंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात सुरू झालेल्या खरीप पेरण्या थांबल्या. जिल्ह्यात ४ लाख ८१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असले, तरी १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख ५७ हजार ४९४ हेक्टर (५३ टक्के) क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा समावेश आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील उर्वरित २ लाख २४ हजार ६ हेक्टर (४७ टक्के) क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्यापही रखडली आहे. रिमझिम पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात करण्यात आलेल्या पीक पेरणीनंतर पिके उगवली; मात्र गत पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने, उगवलेल्या पिकांनीही माना टाकल्या आहेत. सार्वत्रिक दमदार पावसाअभावी पिके धोक्यात आल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गत २०१४ व २०१५ च्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मागील एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस अद्यापही बरसला नसल्याने, यंदाही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर दडी मारून बसलेला पाऊस जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार हजेरी केव्हा लावणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.२५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी; अहवाल शासनाकडे!जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत आठवड्यात शासनाच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही भागात दुबार तर काही भागात तिबार पेरणीचा खर्च सहन करावा लागत आहे.पावसातील खंडामुळे जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी करण्यात आल्याचा अहवाल गत आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. गत तीन-चार दिवसात होत असलेल्या रिमझिम पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाअभावी जिल्ह्यात ४७ टक्के पेरण्या रखडल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांना तूर, तीळ व सूर्यफूल अशा पर्यायी पिकांची पेरणी करावी लागेल.- रवींद्र निकम, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी