शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गांवर काम करणा-यांना मिळणार धोक्याची सूचना

By admin | Updated: May 16, 2015 00:46 IST

तीन वर्षात घडले ६५५ अपघात; ३३ रेल्वे कामगारांचा मृत्यू.

राम देशपांडे/ अकोला : मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर या पाचही विभागात रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करीत असताना गत तीन वर्षांत घडलेल्या ६५५ अपघातात ३३ रेल्वे कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, लांबून येणार्‍या गाडीच्या स्पंदनांचा आधार घेत धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा (इलेक्ट्रॉनिक अर्ली वॉर्निंग सिस्टिम - ईईडब्ल्यूएस) मुंबई विभागाने विकसित केली आहे. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात ही यंत्रणा पाचही विभागात कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली. रेल्वे मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष दक्षता घेतली जाते. रेल्वेने नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक, गँगमन व इतर कामगारांच्या चमूद्वारा आवश्यक त्या ठिकाणी वेळ ठरवून रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते. बहुतांश वेळा रेल्वेने प्रवास करीत असताना आपण रेल्वे मार्गांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पाहिले असेल. काम सुरू असलेल्या ठिकाणी दोन कर्मचारी दोन्ही बाजूने येणार्‍या गाड्यांवर लक्ष ठेवण्याकरिता हातात लाल झेंडे घेऊन उभे राहतात. मार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती त्या ठिकाणाहून जाणार्‍या गाडीच्या चालकासदेखील दिली जाते. मात्र, बहुतांश प्रसंगी झेंडे घेऊन उभे राहणारे रेल्वेचे कर्मचारी इंजिन ड्रायव्हरच्या दृष्टीस पडत नाहीत, आणि येथेच घात होतो. गेल्या तीन वर्षांंत मध्य रेल्वेच्या पाचही विभागात असे ६५५ अपघात घडले असून, त्यात ३३ रेल्वे कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर बाबीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबई विभागाने ५00 ग्रॅम वजनाचे उपकरण विकसित केले आहे. अत्यंत कमी वजन असल्याने सहज उचलून नेता येणारे हे उपकरण ज्या ठिकाणी देखभाल-दुरुस् तीचे काम सुरू आहे, त्याठिकाणी लावलं जातं. १२00 मीटरपर्यंत आलेल्या गाडीच्या स्पंदनांचा ठाव घेताच अलार्म वाजतो. केवळ हाताळणीच्याच नव्हे तर खर्चाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत सोयीस्कर असल्याचे मत रेल्वेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.