शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याचे शेतक-यांपुढे आव्हान

By admin | Updated: December 8, 2014 01:14 IST

विदर्भातील शेतकरी व विदेशी कृषितज्ज्ञांचा सूर.

अकोला: विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान केवळ शेतकर्‍यांपुरते र्मयादित नाही, तर समाज व शासनापुढेही ते आहे. कृषी पद्धती, बी-बियाण्यांच्या किमती, एकूण उत्पादन खर्च व बाजारात कृषी उत्पादनास मिळणारे भाव, यात जगभरात तफावत असून, यावर साक ल्याने विचार होणे गरजेचे असल्याचा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला परिसंवादाच्या शेवटच्या खुल्या चर्चासत्रात उमटला. भारताप्रमाणे प्रगत देशांतील शेतकरीदेखील संकटात आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे प्रग त राष्ट्रांसह आफ्रिका खंडातील देशांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिसून येत असल्याचे विदेशी कृषितज्ज्ञांनी स्पष्ट केले. प्रगत देशांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी तेथील सरकार कुठलीही मदत करीत नाही. इंग्लंडमध्ये आत्महत्या करणे हा गुन्हा नसल्याचे इंग्लंड येथील महिला शेतकरी मोनिका हॉवर्ट यांनी स्पष्ट केले. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यास स्वयंसेवी संस्था मदत करतात, असे केनियाच्या डोमिनका वान्झरू यांनी स्पष्ट केले. विदेशात कृषिमालाचे भाव सरकार नियंत्रित करीत नाही, तर विक्रे ते व अडतेच निश्‍चित करत असल्याचे ऑस्ट्रेलियाचे फिल जेफरीज् यांनी सांगितले. भारताप्रमाणेच कृषिमालाचे जास्त उत् पादन झाल्यास भाव कमी मिळतो व कमी उत्पादन असल्यास तुलनेने जास्त भाव मिळतात. काही विदेशी कंपन्यांनी पारंपरिक वाणांचे पेटेंट मिळविले असून, त्यामुळे बियाण्यांवर एकाधिकार मिळविला आहे. ऑस्ट्रेलियात तर बियाणे कंपनीकडूनच बियाणे घेणे शेतकर्‍यांसाठी बंधनकारक केले आहे. असे असतानादेखील पीकहानी झाल्यास त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नसल्याचे वास्तव फिल जेफेरीज् यांनी पुढे मांडले. भारताप्रमाणे इतर देशात कृषिमूल्य आयोग नाही. इतर कुठल्याही देशात बियाणे व खतांवर सवलत दिली जात नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. सेंद्रिय शेती भविष्याची गरज असली तरी केवळ तिच्यावर विसंबून जगाची अन्नाची गरज पूर्ण होऊ शक त नाही. त्यामुळे सेंद्रिय व रासायनिक शेतीमध्ये संतुलन साधण्याची गरज असल्याचे मत फ्रान्स येथील क्लाऊड बॉडींन यांनी व्यक्त केले. कृषी यांत्रिकीकरणाला र्मयादा असल्याचे जेफेरीज् यांनी अधोरेखित केले. कृषी मजुरांचा प्रश्नदेखील यावेळी उपस्थित केला होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. यावेळी आंतरराष्ट्रीय शेतकरी संवादचे सचिव जीम वेगन, ऑस्ट्रेलियातील फिल जेफरीज, उझबेकिस्तानच्या मुस्ताफिना फेरूझा, केनियाच्या डोमिनका वान्झरू व कॅनडाच्या शर्मिला गुंजल व्यासपीठावर उपस्थित हो त्या. चर्चासत्रात कुटासा येथील शिवाजीराव देशमुख, यवतमाळचे माणिक कदम, दर्यापूरचे अरविंद नळकांडे, मोर्शी येथील माणिकलाल मंत्री, राजकुमार भटकळ, सुनंदा सालोडकर, ललित बहाळेंसह इतर शेतकर्‍यांनी सहभाग घेऊन कृषिप्रश्नावर परदेशी शेतकर्‍यांचे व कृषितज्ज्ञांची मते जाणून घेतली.