शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या हत्येनंतर सत्य लपवून असत्याचा प्रचार अधिक!

By admin | Updated: February 5, 2016 02:06 IST

तुषार गांधी यांनी ‘गांधी समजून घेताना’ व्याख्यानात हिंदुत्ववादी संघटनांच्या अतिमहत्त्वाकांक्षेवर प्रहार केला.

अकोला: महात्मा गांधी यांची हत्या ही कुण्या एका व्यक्तीची नव्हे, तर विचारांची हत्या होती. महात्मा गांधींच्या विचारांनी हिंदुत्ववाद्यांच्या महत्त्वाकांक्षेला ठेच पोहचवल्याने त्यांची 'हिंदू राष्ट्र' संकल्पना प्रत्यक्षात साकारताना दिसत नव्हती. त्यामुळे गांधींची हत्या करून सत्य लपवून त्यांच्याबाबत अपप्रचारच अधिक करण्यात आल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. आम्ही सारे फाउंडेशन आणि बहुजन पत्रकार संघ यांच्यावतीने गुरुवारी प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित 'गांधी समजून घेताना' या विषयावरील व्याख्यानात तुषार गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजाभाऊ देशमुख, नानासाहेब चौधरी, प्रा. मधु जाधव हे विचारवंत उपस्थित होते. यावेळी डॉ. गजानन नारे, सुहास उदापूरकर, प्रदीप अवचार, गजानन घोंगडे, निरज आवंडेकर, अनिल महोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बापूंना समजून घेताना त्यावेळच्या परिस्थितीचे अवलोकन केले तेव्हा गांधींच्या हत्येमागील सत्य कधी पुढे येऊच दिले नाही, याबाबत आश्‍चर्य वाटले. सत्य समजून घेतले नाही, तर ज्या तत्त्वांनी बापूंची हत्या केली, त्यांचा विचारच इतिहास होईल. सत्य कधी समजून घेतले नाही, तर हा इतिहास अभ्यासातील एक धडा होऊन बसेल. बापूंची हत्या होण्यापूर्वी दहा दिवस आधी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्यानंतरही सुरक्षा यंत्रणांनी कोणतीच काळजी का घेतली नाही? पुन्हा येऊ, असा इशारा देऊन गेल्यानंतर हत्या कशी झाली? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. देशाची फाळणी, पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी रुपये यासाठी बापूंना दोषी ठरवून त्यांच्या हत्येमुळे हा देश वाचला असल्याचा अपप्रचार केला जातो.प्रत्यक्षात महात्मा गांधी यांच्यावर पहिला हल्ला १९३४ मध्ये झाला, त्यावेळी देशाची फाळणी झाली नव्हती, पाकिस्तानला पैसे ही दिले नव्हते. राजकारणापासून दूर होत बापूंनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले. बापूंवर झालेल्या हल्याच्या वेळी वारंवार एका व्यक्तीचे नाव पुढे येत होते, ते म्हणजे नाथुराम गोडसे. याबाबत सबळ पुरावे त्यावेळी मिळाले होते. बापूंच्या प्रार्थनेच्या वेळीही त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. २0 जानेवारी १९४८ ला बापूंच्या प्रार्थनेच्या वेळी बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मदनलाल पकडल्या गेला. त्यानंतर दहा दिवसांमध्येच त्यांची हत्या नाथुराम गोडसेने केली. ही हत्या करण्यासाठी गोडसेकडे पिस्तूल आले कोठून? त्यासाठी पैसा कुणाचा होता? तात्याराव म्हणजे सावरकरांचा आशीर्वाद नाथुराम आणि आपटे यांनी कशासाठी घेतला होता? सावरकरांनी त्यांना विजयी होऊन या, हा आशीर्वाद कशासाठी दिला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून कधीच झाला नाही. हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी पाच राज्यांनी मिळून प्रयत्न केला होता. त्यात ग्वाल्हेरचा समावेश होता. ग्वाल्हेर येथूनच नाथुराम गोडसेकडे पिस्तूल आले. ज्या परचुरेच्या माध्यमातून त्याच्याकडे पिस्तूल आले, तो परचुरे ग्वाल्हेर राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून होता. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याने तोही सुडाच्या राजकारणाने या कटात सहभागी झाला होता. त्याचा तपास यंत्रणांनी का केला नाही? सावरकरांना वाचविण्यासाठी बडगेला साक्षीचा माफीदार केले. एकसारखेच पुरावे असताना दोघांना निर्दोष सोडले. त्याच पुराव्यावर दोघांना जन्मठेप देण्याचा निर्णय कसा झाला? या प्रश्नांची उत्तर शोधली तेव्हा सत्य पुढे आले आणि तेच मी येथे मांडले असल्याचे तुषार गांधी शेवटी म्हणाले. आभार प्रदर्शन अशोक ढेरे यांनी केले.