शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कृषीपंपाच्या ऑडीटसाठी ८१९ कोटीची तरतुद

By admin | Updated: April 21, 2015 00:25 IST

प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा राज्य शासनाचा निर्धार; विदर्भाच्या वाट्याला ३५९ कोटी रुपये.

बुलडाणा: विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील विद्युत पंपाचा असलेला प्रादेशिक असमतोल आणि वापरापेक्षा येत असलेले जास्तीचे विद्युत बिलामुळे शेतकर्‍यांच्या तक्रारीची दखल घेत राज्य शासनाने कृषिपंपांचे ऑडिट करण्याचा निर्णय ८ मार्च रोजी घेतला. शासनाच्या या निर्णयानंतर महावितरणने याबाबत प्रस्ताव तयार केले असून लवकरच या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यासाठी राज्य शासनाने ८१९ कोटी रुपयाची तरतुद केल्याची माहिती आहे. यामध्ये विदर्भाच्या वाट्यावर ३५९ कोटी रुपये आले आहेत. राज्यात एकूण ३६.४८ लाख कृषीपंप आहेत. यातील सर्वच कृषिपंपांना मीटर लागलेले नाहीत. राज्यातील कृषीपंपाना सरासरी बील पाठविण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात कृषिपंपाचा वापर नसला तरी सुध्दा शेतकर्‍यांना बील पाठविण्यात येते. अनेकदा असेही होते की, बिलात दर्शवलेला विजेचा वापर हा त्या फीडरला मिळालेल्या एकूण विजेपेक्षा अधिक असतो. यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात शेतकर्‍यांच्या नेहमीच तक्रारी असतात. मात्र या तक्रारीची कंपनीने कधीच गांभीर्याने दखल घेतली नाही. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे विजेची होणारी हानी, वीज चोरीची खरी शुक्ष्म महिती, विज पंपाच्या बॅकलॉगची जिल्हानिहाय आकडेवारी समोर येणार आहे. कृषीपंपांच्या विद्युतीकरणाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने युध्दपातळीवर पाऊले उचलली आहेत. एका पाहणीनुसार मागील १५ वर्षात पश्‍चिम महाराष्ट्रात ५ लाखापेक्षा अधिक कृषीपंप लागले आहेत. याच कालावधीत विदर्भात दोन लाख पंपांचा अनुशेष निर्माण झाला. हा असमतोल दुर करण्यासाठी शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ८१९ कोटींची तरतूद केली आहे.

असा होणार ऑडीटवर खर्च

      विदर्भ आणि मराठवाड्यावर खर्च होणार्‍या ८१९ कोटी रुपयामध्ये मराठवाड्याच्या वाट्याला ४६0 कोटी रुपये तर विदर्भाच्या वाट्याला ३५९ कोटी रुपये येणार आहेत. यात बुलडाण्याला ७0 कोटी, अकोला ४३, वाशिम २५ कोटी, अमरावती ४७ कोटी, यवतमाळ ५७ कोटी, नागपूर ४३ कोटी, वर्धा २५ कोटी, भंडारा २८ कोटी आणि गोंदियाला २१ कोटी रुपये मिळणार आहेत. तर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला ७४ कोटी, हिंगोली २७ कोटी, नांदेड २९ कोटी, बीड ५९ कोटी, उस्मानाबाद ८३ कोटी, लातूर ५0 कोटी, औरंगाबाद ९२ कोटी आणि जालना ४३ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अनुशेष दूर करण्यासाठी विदभार्तील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र १५८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

*     पश्‍चिम महाराष्ट्रात बारमाही ओलिताची शेती केली जाते. पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे दीड दोन एकर शेतीचा मालक सुध्दा बारमाही पीक घेतो. सहाजीकच पश्‍चिम महाराष्ट्रात विद्युत पंपाची संख्याही अधिक आहे. या तुलनेत विदर्भ व मराठवाड्याची उलट परिस्थिती आहे. एकतर सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे, तेच शेतकरी दुबार पीक घेतात. त्यातही पूर्णवेळ वीज कधीच नसते. म्हणजे विद्युत पंपाची संख्या कमी आणि विजेचा वापरही कमी असे असताना बील वसुल करताना मात्र सर्वांना एकच नियम लागू करण्यात आला आहे. त्याचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांना बसतो. हा अन्याय दुर करण्यासाठी आणि विज पंपाचा समतोल दुर करण्यासाठी शासनाने विज पंपाचे ऑडीट सुरू केले आहे.