शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

फणी गावावर ७० वर्षांच्या म्हातारीचे अधिराज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे अनेक गावे उजाड झाली; मात्र मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या किणी, फणी ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे अनेक गावे उजाड झाली; मात्र मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या किणी, फणी हे गाव मात्र अपवाद आहे. गावात राहणाऱ्या लोकांनी गाव सोडून विविध ठिकाणी स्थायिक झाले, परंतु या गावात केवळ एकच ७० वर्षांची म्हातारी वास्तव्य करीत आहे. एकेकाळी दोनशे लोकवस्ती असलेल्या गावात आता ७० वर्षीय म्हातारीचे अधिराज्य असल्याचे चित्र आहे.

मूर्तिजापूरपासून १२ किलोमीटरवर फणी गाव वसलेले होते. धानोरा वैद्य, किणी, फणी या तीन गावांचा समावेश असलेली धानोरा वैद्य गट ग्रामपंचायत आहे. या गट ग्रामपंचायतीमध्ये फणी या गावात दोनशेच्यावर लोकवस्ती होती. गावात रस्ते, पाणी, वीज या सर्व सुविधा अद्यापही आहेत. सुविधा असतानासुद्धा येथील लोकांनी इतरत्र वास्तव्य केल्याने फणी हे गाव उजाड झाले, तरी अन्नपूर्णा देवीदास खंडारे ही ७० वर्षांची म्हातारी अजूनही वास्तव्यास आहे. या म्हातारीचे घरही आता क्षतिग्रस्त झाले असून, पावसाळ्याच्या दिवसात घर गळत असल्याने म्हातारीने शेजारीच असलेल्या किणी गावात आता तात्पुरता आश्रय घेतला आहे. या गावातील सर्व घरांची पडझड झाली असून, काही घरांचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. केवळ हनुमानाचे मंदिर व एक हातपंप सुस्थितीत आहे.

-----------------

तालुक्यातील १८ गावे उजाड

तालुक्यात एकूण २६४ गावे आहेत. त्यापैकी १८ गावे उजाड असून, एकेकाळी दोनशेच्यावर लोकसंख्या असलेल्या फणी गावातील लोकांनी हळूहळू आपले गाव सोडले असल्याने तेही उजाड अवस्थेत झाले आहे. २०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या केवळ ३५ असून, तेथे १७ महिला व १९ पुरुष वास्तव्य करीत असल्याची शासकीय दरबारी नोंद आहे. प्रत्यक्षात गावात भेट दिली असता एक ७० वर्षीय म्हातारी वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर म्हातारी किणी या शेजारील गावातील गुरे चारून आपला उदरनिर्वाह करीत आहे.

------------------------

पूर्वी या गावात लोकवस्ती होती, हळूहळू गावातील लोकांनी आपली घरे सोडली, त्यामुळे आता या गावात माझ्याशिवाय दुसरे कोणीच राहत नाही. मी गाव सोडले तर संपूर्ण गावच उजाड होईल.

-अन्नपूर्णाबाई खंडारे, रहिवासी, फणी

--------------------

फणी, किणी आणि धानोरा वैद्य ही तीन गावे मिळून धानोरा गट ग्रामपंचायत आहे. परंतु आजमितीस फणी गावात एका म्हातारीशिवाय कोणीच राहत नाही. संपूर्ण गावच उजाड झाले आहे. तीचे घर गळत असल्याने तीला किणी गावात तात्पुरता आश्रय दिला आहे.

-जयश्री तायडे, किणी, पंचायत समिती सदस्या, मूर्तिजापूर