शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

फणी गावावर ७० वर्षांच्या म्हातारीचे अधिराज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे अनेक गावे उजाड झाली; मात्र मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या किणी, फणी ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे अनेक गावे उजाड झाली; मात्र मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या किणी, फणी हे गाव मात्र अपवाद आहे. गावात राहणाऱ्या लोकांनी गाव सोडून विविध ठिकाणी स्थायिक झाले, परंतु या गावात केवळ एकच ७० वर्षांची म्हातारी वास्तव्य करीत आहे. एकेकाळी दोनशे लोकवस्ती असलेल्या गावात आता ७० वर्षीय म्हातारीचे अधिराज्य असल्याचे चित्र आहे.

मूर्तिजापूरपासून १२ किलोमीटरवर फणी गाव वसलेले होते. धानोरा वैद्य, किणी, फणी या तीन गावांचा समावेश असलेली धानोरा वैद्य गट ग्रामपंचायत आहे. या गट ग्रामपंचायतीमध्ये फणी या गावात दोनशेच्यावर लोकवस्ती होती. गावात रस्ते, पाणी, वीज या सर्व सुविधा अद्यापही आहेत. सुविधा असतानासुद्धा येथील लोकांनी इतरत्र वास्तव्य केल्याने फणी हे गाव उजाड झाले, तरी अन्नपूर्णा देवीदास खंडारे ही ७० वर्षांची म्हातारी अजूनही वास्तव्यास आहे. या म्हातारीचे घरही आता क्षतिग्रस्त झाले असून, पावसाळ्याच्या दिवसात घर गळत असल्याने म्हातारीने शेजारीच असलेल्या किणी गावात आता तात्पुरता आश्रय घेतला आहे. या गावातील सर्व घरांची पडझड झाली असून, काही घरांचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. केवळ हनुमानाचे मंदिर व एक हातपंप सुस्थितीत आहे.

-----------------

तालुक्यातील १८ गावे उजाड

तालुक्यात एकूण २६४ गावे आहेत. त्यापैकी १८ गावे उजाड असून, एकेकाळी दोनशेच्यावर लोकसंख्या असलेल्या फणी गावातील लोकांनी हळूहळू आपले गाव सोडले असल्याने तेही उजाड अवस्थेत झाले आहे. २०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या केवळ ३५ असून, तेथे १७ महिला व १९ पुरुष वास्तव्य करीत असल्याची शासकीय दरबारी नोंद आहे. प्रत्यक्षात गावात भेट दिली असता एक ७० वर्षीय म्हातारी वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर म्हातारी किणी या शेजारील गावातील गुरे चारून आपला उदरनिर्वाह करीत आहे.

------------------------

पूर्वी या गावात लोकवस्ती होती, हळूहळू गावातील लोकांनी आपली घरे सोडली, त्यामुळे आता या गावात माझ्याशिवाय दुसरे कोणीच राहत नाही. मी गाव सोडले तर संपूर्ण गावच उजाड होईल.

-अन्नपूर्णाबाई खंडारे, रहिवासी, फणी

--------------------

फणी, किणी आणि धानोरा वैद्य ही तीन गावे मिळून धानोरा गट ग्रामपंचायत आहे. परंतु आजमितीस फणी गावात एका म्हातारीशिवाय कोणीच राहत नाही. संपूर्ण गावच उजाड झाले आहे. तीचे घर गळत असल्याने तीला किणी गावात तात्पुरता आश्रय दिला आहे.

-जयश्री तायडे, किणी, पंचायत समिती सदस्या, मूर्तिजापूर