शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आठ सिंचन प्रकल्पांसाठी ३१२ कोटी मंजूर!

By admin | Updated: July 22, 2016 00:31 IST

बाजोरियांची लक्षवेधीवर जलसंपदा मंत्र्यांची घोषणा; कामे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश.

अकोला : जिल्ह्यातील तब्बल आठ सिंचन प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडली आहेत. मागील नऊ वर्षांपासून सिंचन प्रकल्पांची कामे सुरू असली तरी अद्यापही पूर्णत्वास गेली नसल्याचा मुद्दा विधिमंडळात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित करीत पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले. या प्रश्नावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंचन प्रकल्पांसाठी ३१२ कोटींची घोषणा करून ही कामे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.शेतकर्‍यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, या उद्देशातून जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा भागात आठ सिंचन प्रकल्पांना तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत मंजुरी देण्यात आली होती. २00७ ते २00९ या कालावधीत शासनाने मंजुरी दिलेल्या आठ सिंचन प्रकल्पांची कामे अद्यापही सुरूच आहेत, हे विशेष. प्रकल्पांसाठी निधीची कमतरता असल्याची बोंब मारायची अन् जाणीवपूर्वक कामांना विलंब करण्याचे धोरण संबंधित कंत्राटदार व पाटबंधारे विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी संगनमताने करीत असल्याचा आरोप शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला. संबंधित प्रकल्पांसाठी वारंवार निधीची मागणी केली जाते.यासंदर्भात विधिमंडळात आ. बाजोरिया यांनी गुरुवारी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला असता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आठ सिंचन प्रकल्पांसाठी ३१२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. दरम्यान अशा प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा कालावधी निश्‍चित करण्याची शासनाची जबाबदारी असताना या प्रकारांना पद्धतशीरपणे बगल देण्याचे धोरण प्रशासकीय यंत्रणांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट आहे. कवठा शेलू प्रकल्पाच्या भरावाला भेगा!कवठा शेलू प्रकल्पाचे काम सुरू असतानाच त्याच्या भरावाला भेगा पडल्या आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर भरावासाठी पर्यायी मातीचे परीक्षण नाशिकमार्फत सुरू आहे. परिणामी या प्रकल्पाचे काम स्थगित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.

उमा बॅरेजचे काम बंदसंबंधित कंत्राटदाराने मागील तीन वर्षांपासून उमा बॅरेजचे काम बंद ठेवले आहे. त्यामुळे कंत्राटदाराची निविदा विखंडित करण्याची कार्यवाही सुरू असली, तरी या प्रक्रियेला पाटबंधारे विभागाला तीन वर्षांचा कालावधी कसा लागतो, यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.