शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

आठ सिंचन प्रकल्पांसाठी ३१२ कोटी मंजूर!

By admin | Updated: July 22, 2016 00:31 IST

बाजोरियांची लक्षवेधीवर जलसंपदा मंत्र्यांची घोषणा; कामे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश.

अकोला : जिल्ह्यातील तब्बल आठ सिंचन प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडली आहेत. मागील नऊ वर्षांपासून सिंचन प्रकल्पांची कामे सुरू असली तरी अद्यापही पूर्णत्वास गेली नसल्याचा मुद्दा विधिमंडळात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित करीत पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले. या प्रश्नावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंचन प्रकल्पांसाठी ३१२ कोटींची घोषणा करून ही कामे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.शेतकर्‍यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, या उद्देशातून जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा भागात आठ सिंचन प्रकल्पांना तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत मंजुरी देण्यात आली होती. २00७ ते २00९ या कालावधीत शासनाने मंजुरी दिलेल्या आठ सिंचन प्रकल्पांची कामे अद्यापही सुरूच आहेत, हे विशेष. प्रकल्पांसाठी निधीची कमतरता असल्याची बोंब मारायची अन् जाणीवपूर्वक कामांना विलंब करण्याचे धोरण संबंधित कंत्राटदार व पाटबंधारे विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी संगनमताने करीत असल्याचा आरोप शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला. संबंधित प्रकल्पांसाठी वारंवार निधीची मागणी केली जाते.यासंदर्भात विधिमंडळात आ. बाजोरिया यांनी गुरुवारी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला असता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आठ सिंचन प्रकल्पांसाठी ३१२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. दरम्यान अशा प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा कालावधी निश्‍चित करण्याची शासनाची जबाबदारी असताना या प्रकारांना पद्धतशीरपणे बगल देण्याचे धोरण प्रशासकीय यंत्रणांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होत नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट आहे. कवठा शेलू प्रकल्पाच्या भरावाला भेगा!कवठा शेलू प्रकल्पाचे काम सुरू असतानाच त्याच्या भरावाला भेगा पडल्या आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर भरावासाठी पर्यायी मातीचे परीक्षण नाशिकमार्फत सुरू आहे. परिणामी या प्रकल्पाचे काम स्थगित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.

उमा बॅरेजचे काम बंदसंबंधित कंत्राटदाराने मागील तीन वर्षांपासून उमा बॅरेजचे काम बंद ठेवले आहे. त्यामुळे कंत्राटदाराची निविदा विखंडित करण्याची कार्यवाही सुरू असली, तरी या प्रक्रियेला पाटबंधारे विभागाला तीन वर्षांचा कालावधी कसा लागतो, यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.