शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 10:38 IST

Corona Cases in Akola : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली.

ठळक मुद्देमहिनाभरात २६० जणांचा मृत्यू रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली, मात्र संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १३ हजार ६२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर २६० जणांचा मृत्यू झाला. या चिंताजनक परिस्थितीत गत १५ दिवसात रुग्ण रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग कायमच असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली. एकट्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे १३ हजारावर रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला. दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असून, सुमारे दहापेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या जास्त असून रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या खाटा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्याची स्थिती अकोलेकरांसाठी चिंताजनक आहे, मात्र मागील १५ दिवसात जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८ टक्क्यांनी सुधारला आहे. त्यामुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गत १५ दिवसात ७ हजार ५२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

३१ मार्च ते १४ एप्रिल एकूण चाचण्या - ४०,९५५

पॉझिटिव्ह - ४,४७१

रुग्णालयातून सुटी - ६,१०१

पॉझिटिव्हिटी रेट - १०.९१

रिकव्हरी रेट - ७९.०२

 

१५ एप्रिल ते ३ मे एकूण चाचण्या - ३२,६४१

पॉझिटिव्ह - ९, १५१

रुग्णालयातून सुटी - ७,५२१

 

पॉझिटिव्हिटी रेट - २८.०३

रिकव्हरी रेट - ८७.०२

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

बंदीनंतरही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असून मास्कचा वापर टाळत आहेत. सकाळी ११ वाजता पर्यंत बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

लक्षणे दिसून ही त्याकडे दुर्लक्ष करीत असून, चाचणीला घाबरत आहेत. घरीच उपचाराला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीतही लोक स्वत:चे विलगीकरण करुन घेत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग वाढत आहे.

तरुण वर्ग विनाकारण किंवा कामानिमित्त घराबाहेर पडतो. बाहेरून आल्यानंतर योग्य काळजी न घेताच ते इतरांच्या संपर्कात येतात. या प्रकारामुळे घरात राहूनही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात सर्वत्रच चाचण्यांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे दिसल्यावर त्यांना शहरात जावे लागते.

किरकोळ लक्षणे निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जण घरगुती उपाययोजना करतात.

त्याचा काहीच फरक न पडल्यास शहरात डॉक्टरांकडे तीन ते चार दिवस उपचार घेतात. त्यानंतर बरे न वाटल्यास रुग्ण कोरोना चाचणी करतात.

या काळात कोविडचा रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस