शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 10:38 IST

Corona Cases in Akola : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली.

ठळक मुद्देमहिनाभरात २६० जणांचा मृत्यू रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली, मात्र संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १३ हजार ६२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर २६० जणांचा मृत्यू झाला. या चिंताजनक परिस्थितीत गत १५ दिवसात रुग्ण रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग कायमच असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली. एकट्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे १३ हजारावर रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला. दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असून, सुमारे दहापेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या जास्त असून रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या खाटा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्याची स्थिती अकोलेकरांसाठी चिंताजनक आहे, मात्र मागील १५ दिवसात जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८ टक्क्यांनी सुधारला आहे. त्यामुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गत १५ दिवसात ७ हजार ५२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

३१ मार्च ते १४ एप्रिल एकूण चाचण्या - ४०,९५५

पॉझिटिव्ह - ४,४७१

रुग्णालयातून सुटी - ६,१०१

पॉझिटिव्हिटी रेट - १०.९१

रिकव्हरी रेट - ७९.०२

 

१५ एप्रिल ते ३ मे एकूण चाचण्या - ३२,६४१

पॉझिटिव्ह - ९, १५१

रुग्णालयातून सुटी - ७,५२१

 

पॉझिटिव्हिटी रेट - २८.०३

रिकव्हरी रेट - ८७.०२

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

बंदीनंतरही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असून मास्कचा वापर टाळत आहेत. सकाळी ११ वाजता पर्यंत बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

लक्षणे दिसून ही त्याकडे दुर्लक्ष करीत असून, चाचणीला घाबरत आहेत. घरीच उपचाराला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीतही लोक स्वत:चे विलगीकरण करुन घेत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग वाढत आहे.

तरुण वर्ग विनाकारण किंवा कामानिमित्त घराबाहेर पडतो. बाहेरून आल्यानंतर योग्य काळजी न घेताच ते इतरांच्या संपर्कात येतात. या प्रकारामुळे घरात राहूनही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात सर्वत्रच चाचण्यांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे दिसल्यावर त्यांना शहरात जावे लागते.

किरकोळ लक्षणे निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जण घरगुती उपाययोजना करतात.

त्याचा काहीच फरक न पडल्यास शहरात डॉक्टरांकडे तीन ते चार दिवस उपचार घेतात. त्यानंतर बरे न वाटल्यास रुग्ण कोरोना चाचणी करतात.

या काळात कोविडचा रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस