शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 10:38 IST

Corona Cases in Akola : जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली.

ठळक मुद्देमहिनाभरात २६० जणांचा मृत्यू रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली, मात्र संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १३ हजार ६२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर २६० जणांचा मृत्यू झाला. या चिंताजनक परिस्थितीत गत १५ दिवसात रुग्ण रिकव्हरी रेटमध्ये ८ टक्क्यांची सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग कायमच असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढू लागली. एकट्या एप्रिल महिन्यात कोरोनाचे १३ हजारावर रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला. दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असून, सुमारे दहापेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या जास्त असून रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या खाटा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्याची स्थिती अकोलेकरांसाठी चिंताजनक आहे, मात्र मागील १५ दिवसात जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८ टक्क्यांनी सुधारला आहे. त्यामुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गत १५ दिवसात ७ हजार ५२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

३१ मार्च ते १४ एप्रिल एकूण चाचण्या - ४०,९५५

पॉझिटिव्ह - ४,४७१

रुग्णालयातून सुटी - ६,१०१

पॉझिटिव्हिटी रेट - १०.९१

रिकव्हरी रेट - ७९.०२

 

१५ एप्रिल ते ३ मे एकूण चाचण्या - ३२,६४१

पॉझिटिव्ह - ९, १५१

रुग्णालयातून सुटी - ७,५२१

 

पॉझिटिव्हिटी रेट - २८.०३

रिकव्हरी रेट - ८७.०२

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

बंदीनंतरही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असून मास्कचा वापर टाळत आहेत. सकाळी ११ वाजता पर्यंत बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

लक्षणे दिसून ही त्याकडे दुर्लक्ष करीत असून, चाचणीला घाबरत आहेत. घरीच उपचाराला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीतही लोक स्वत:चे विलगीकरण करुन घेत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग वाढत आहे.

तरुण वर्ग विनाकारण किंवा कामानिमित्त घराबाहेर पडतो. बाहेरून आल्यानंतर योग्य काळजी न घेताच ते इतरांच्या संपर्कात येतात. या प्रकारामुळे घरात राहूनही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात सर्वत्रच चाचण्यांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे दिसल्यावर त्यांना शहरात जावे लागते.

किरकोळ लक्षणे निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जण घरगुती उपाययोजना करतात.

त्याचा काहीच फरक न पडल्यास शहरात डॉक्टरांकडे तीन ते चार दिवस उपचार घेतात. त्यानंतर बरे न वाटल्यास रुग्ण कोरोना चाचणी करतात.

या काळात कोविडचा रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस