शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
3
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
5
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
6
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
7
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
8
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
9
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
10
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर
11
काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल
12
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
13
Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
14
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
15
Mutual Fund असावा तर असा! कोणताही गाजावाजा नाही, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला जबरदस्त रिटर्न
16
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
17
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
18
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
19
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
20
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?

पश्‍चिम विदर्भात कुष्ठरोगाचे १२00 नवीन रुग्ण!

By admin | Updated: February 4, 2016 01:26 IST

सर्वाधिक कुष्ठरोगाचे रुग्ण अमरावती व यवतमाळ जिल्हय़ात असल्याची माहिती.

नितीन गव्हाळे / अकोला: कुष्ठरोग अर्थात महारोग, जिवंतपणी मनुष्याला मरणयातना देणारा हा भयानक आजार. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असले तरीही कुष्ठरोगाच्या जाळय़ात अनेक नागरिक ओढल्या जात आहेत. पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ांमध्ये गतवर्षात १२0९ नवीन कुष्ठरोगी रुग्ण आढळून आहेत. यात सर्वाधिक रुग्ण अमरावती व यवतमाळ जिल्हय़ात असल्याची माहिती कुष्ठरोग विभागाचे अवैद्यकीय पर्यवेक्षक एस.पी. देशमुख यांनी दिली. कुष्ठरोग निवारणासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येतात; परंतु कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यात अपयश येत आहे. कुष्ठरोग प्रामुख्याने विकृतीसाठी ओळखला जातो. शरीराचे तीन अवयव कुष्ठरोगामुळे प्रभावित होतात. हाताचे व पायाचे पंजे आणि डोळय़ांना कुष्ठरोगामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. या आजारामुळे व्यक्ती जिवंत असूनही मेल्यासारखाच बनतो. त्याच्या वाट्याला कुटुंब, नातेवाईक आणि समाजाकडून उपेक्षाच येते. शरीरावर कोणताही चट्टा असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केलेली उपयोगाचे ठरते. शरीरावर पाचपेक्षा अधिक चट्टे असतील तर तो रुग्ण सांसर्गिक म्हणून ओळखला जातो. पाचपेक्षा कमी चट्टे असतील तर असांसर्गिक अशी व्याख्या कुष्ठरोग विभागाने केली आहे. शरीरावर चट्टे दिसून आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्यास घातक ठरू शकते. हाता, पायांना विकृती येईपर्यंंत फार उशीर झालेला असतो, त्यामुळे नागरिकांनी वेळीच खबरदारी घेऊन योग्यवेळी उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णत: बरा होऊ शकतो. आरोग्य विभागाच्या उपाययोजना आणि औषधोपचार उपलब्ध असल्यानंतरही पश्‍चिम विदर्भात दरवर्षी कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामागे नागरिकांची उदासीनता हे प्रमुख कारण आहे.