शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

आमच्या गावाला स्मशानभूमी कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST

अहमदनगर : गावात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे? अशी समस्या गावकऱ्यांना पडते. सरकारने हक्काची जागा उपलब्ध ...

अहमदनगर : गावात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे? अशी समस्या गावकऱ्यांना पडते. सरकारने हक्काची जागा उपलब्ध करून न दिल्याने अनेकवेळा तंटे होतात. त्यामुळे आमच्या गावात त्वरीत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ९७ गावांनी संबंधित गटविकास अधिकारी, तहसीलदारांकडे केली आहे. स्मशानभूमीसाठी सरकारी किंवा खासगी जागा उपलब्ध आहे का, याचा प्रशासनाकडून शोध सुरू झाला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महसूल सप्तपदी विजय अभियानाद्वारे महसूलशी संबंधित विविध प्रश्नांचा निपटारा करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये ज्या गावांना स्मशानभूमी नाही, अशा गावांसाठी शासकीय जमिन उपलब्ध करून देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांना प्रत्येक गावाचा आढावा घेण्याचा आदेश दिला होता. स्मशानभूमी किंवा दफनभूमीसाठी किमान सुविधा, अद्याप अजिबात सुविधा नाही किंवा पुरेशी सुविधा उपलब्ध आहे, मात्र मोठ्या स्मशानभूमीची गरज आहे, अशा गावांचा संबंधित तहसीलदारांनी आढावा घेतला. त्यामध्ये ९७ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे आढळून आले. स्मशानभूमीसाठी शासकीय जमिन उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित गावांनी तहसीलदारांकडे केली आहे.

-------------

स्मशानभूमी नसलेल्या गावांची संख्या

तालुका स्मशानभूमी नसलेल्या गावांची संख्या

अहमदनगर ३

नेवासा निरंक

श्रीरामपूर ३

राहुरी २४

राहाता २

कोपरगाव २

संगमनेर ७

अकोले २३

पाथर्डी १७

शेवगाव २

कर्जत १

जामखेड २

श्रीगोंदा २

पारनेर ९

एकूण ९७

-------------------

असा आहे कार्यक्रम

स्मशानभूमीच्या मागणीबाबत गावाचा ठराव घेणे-२२ ते २८ फेब्रुवार

ठरावासह गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल देणे-१ ते ९ मार्च

गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल तहसीलदारांना देणे-१० ते १६ मार्च

तहसीदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल देणे-१७ ते २३ मार्च

प्राप्त प्रस्तावांवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश-२४ ते ३१ मार्च

----------------

स्मशानभूमीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी

बऱ्याच गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही. जिथे सरकारी जमिनी आहेत, अशा गावांना तातडीने स्मशानभूमीसाठी जागा द्यायची आहे. ज्या गावांमध्ये शासकीय जमिनी नाहीत, अशा गावांमध्ये खासगी जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. काही गावांमध्ये परंपरांगत खासगी जागेत स्मशानभूमी आहेत, अशा स्मशानभूमीच्या जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग कराव्या लागणार आहेत. जिथे सरकारी जागा नाही, अशा गावांबाबत भूसंपादानाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेले आहेत. तेथे जिल्हा विकास योजना आराखड्यातून पैसे उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

-------

धर्मनिहाय स्मशानभूमीचे वाद

अनेक गावांमध्ये जाती-धर्माप्रमाणे स्मशानभूमीची मागणी केली जाते. संबंधित गावांची अशी मागणी असेल आणि तशी जागा उपलब्ध असेल तर उपलब्ध जागेची विभागणी करण्याबाबत विचार करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे. दहनभूमी आणि दफनभूमी अशी विभागणी करणे हे जागेच्या उपलब्धतेनुसार शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------