शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी टंचाई

By admin | Updated: July 1, 2014 00:14 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६६८ प्राथमिक शाळा आहेत. यातील बहुतांशी ठिकाणी पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६६८ प्राथमिक शाळा आहेत. यातील बहुतांशी ठिकाणी पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. या प्राथमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन शिक्षण विभागासमोर आहे.जून महिना संपत आला असून सध्या २३५ गावे आणि १ हजार वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यातील बहुतांशी गावात आणि वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. लवकर पाऊस न झाल्यास या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जिल्ह्यातील टँकरचा आकडा ३०० च्या पुढे गेला असून त्यातून ५ लाख ३० हजार ८३७ लोकांची तहान भागविली जात आहे.१६ जूनला प्राथमिक शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या पंधरवाड्यात शिक्षकांना शाळा बाह्य मुलांना शाळेत आणणे, पुस्तके, गणवेश वाटप आदी महत्वाची कामे करावी लागतात. त्याच शाळेत पिण्यासाठी पाणी नसल्याने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.जिल्ह्यात नेमक्या किती शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, याबाबत शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांच्याकडे विचारणा केली असता, ते उपलब्ध झाले नाही. मात्र, शिक्षण विभागाकडे असणाऱ्या माहितीनुसार १५० ठिकाणी पाणी साठवण व्यवस्था नाही. मात्र, जिल्ह्यात सध्या टंचाईची परिस्थिती असल्याने ज्या ठिकाणी उद्भवात पाणी नाही. त्या ठिकाणी यंत्रणा असून देखील पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अशा प्रकारे पाणी नसल्याने टंचाई निर्माण झाली असल्याची कोणतीच माहिती नाही.(प्रतिनिधी)पदोन्नतीचे वेधयंदापासून तिसरी आणि चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. विद्यार्थ्यी नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तकात रमलेले आहे. शिक्षकांना मात्र पदोन्नतीचे वेध लागलेले आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने पदोन्नत्या पूर्ण करून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.पाऊस लांबल्याने पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. शिक्षण विभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. अवघ्या दीडशे ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्याची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आहे.-गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी.