शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

हजार गावे टँकरवर

By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST

अहमदनगर : जिल्ह्यात टंचाईची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या १८९ गावे आणि ८१८ वाड्या-वस्त्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात टंचाईची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्या १८९ गावे आणि ८१८ वाड्या-वस्त्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे. तब्बल २४७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अवघ्या १५ गावांत टंचाई होती. आजअखेर पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. तेथे ३८ गावे व १२८ वाड्यांना टँकरने पाणी दिले जात आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६६१ लोकांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. जिल्ह्यात श्रीरामपूर आणि राहुरीत एकही गाव टंचाईग्रस्त नाही. श्रीगोंदा व नेवाशात प्रत्येकी दोन गावे टंचाईग्रस्त आहेत. एकूण २४७ पैकी २४ शासकीय व २२३ टँकर हे खासगी आहेत. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्यास त्याचा फायदा होणार असून टँकर कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा डोळा आकाशाकडे लागला असून सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात टंचाई वाढल्याने खासगी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित केल्या आहेत. टंचाई काळात टँकरची मागणी वाढत असल्याने सरकारने ते त्वरित मिळावे यासाठी तहसीलदारांना मंजुरीचे आदेश दिले आहेत. संबंधित गावांमध्ये मागणीप्रमाणे रोहयोची कामेही मंजूर केली आहेत. -अनिल कवडे, जिल्हाधिकारीमंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरू झाली असून त्याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राहुरी आणि श्रीरामपूर तालुका लकी ठरला असून या ठिकाणी एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. संगमनेर - ३८, अकोले - ७, कोपरगाव ७, नेवासा - ४, राहाता ७, नगर - ३९, पारनेर - २३, पाथर्डी -५७, शेवगाव - १९, कर्जत - २३, जामखेड - २१, श्रीगोंदा -२.