शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

थोरात, विखेंशी चर्चेनंतर उमेदवारीचा निर्णय

By admin | Updated: July 14, 2014 00:58 IST

श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुतेंच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करावा ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.

श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुतेंच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करावा ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवारीचा फैसला करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीगोंदा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.शिरूर, दौंड, आंबेगाव तालुक्यात श्रीगोंद्यापेक्षा जादा सबस्टेशन आहेत. श्रीगोंद्यात सबस्टेशन झाली मग शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही. कुकडीवाल्यांना पाण्याचा हिशोब दिला जात नाही. घोड धरणाच्यावर बंधारे झाल्याने घोडवाल्याचा गळा घोटला आहे, याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत विखे, थोरात यांनी श्रीगोंद्यात आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश दिला तर काय करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच आम्ही आयुष्यभर आघाडीचा धर्म पाळायचा का? ही निवडणूक कुणा एका व्यक्तीच्या विरोधात नसून विकास, समाजकारणातील प्रश्न सोडविण्यासाठी एका विचाराने लढवावी लागणार आहे, असे नागवडेंनी शेवटी सूचित केले. जगतापांना चिमटातिकीट मिळो अथवा ना मिळो मी उभा राहणार असे काहींनी जाहीर केले आहे, परंतु आम्ही तसे करणार नाही. आमची सर्वांना बरोबर घेण्याची तयारी आहे, असा चिमटा नागवडेंनी जगतापांना काढला. कोणी शब्द दिला!यावेळी तुम्ही मदत करा पुढील वेळी आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द कुणाला दिला नव्हता. शब्द दिला असता तर सभेत सांगितले असते. ते बरोबर आले तर उद्या त्यांनाही बरोबर घेऊ.-राजेंद्र नागवडे, माजी अध्यक्ष, श्रीगोंदा साखर कारखाना.घर कसे चालणारएकास एक उमेदवार देण्यासाठी राहुल जगताप यांची समजूत घालू आणि वेळप्रसंगी घनश्याम शेलार यांच्याशी बोलावे लागणार आहे. सर्वजण कारभारी झाले तर घर कसे चालणार. भल्यासाठी चार पावले मागे घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.-बाळासाहेब नाहाटा, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदाराष्ट्रवादीचे षडयंत्रआमची एकास एक उमेदवार देण्याची तयारी आहे, परंतु राष्ट्रवादीवाले जादा उमेदवार उभे करण्यासाठी षडयंत्र रचित आहेत.-आण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष, जि.प....तर सत्ता परिवर्तनश्रीगोंद्यात एकास एक उमेदवार आणि २००४ प्रमाणे श्रीगोंदा विधानसभा विकास आघाडी स्थापन केली तर सत्ता परिवर्तन निश्चित होईल.-प्रा.तुकाराम दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस.