शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

बिगारींच्या हाती अग्निशमन बंबाचे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात २७ पैकी तब्बल १९ कर्मचारी अप्रशिक्षित असून, केवळ ८ जण प्रशिक्षित आहेत. त्यामुळे ...

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात २७ पैकी तब्बल १९ कर्मचारी अप्रशिक्षित असून, केवळ ८ जण प्रशिक्षित आहेत. त्यामुळे आगीपासून बचाव करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागाचा कारभारच बिगारींच्या हाती आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा रामभरोसे असल्याचे यावरून स्पष्ट होते.

शहरातील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहेत. नवीन इमारती उभ्या राहत आहेत. सुमारे चार लाख लोकसंख्या असलेल्या नगर शहरात नवीन इमारतींबरोबरच जुन्या इमारतींची संख्याही मोठी आहे. आगीच्या घटना घडतात. अशा वेळी महापालिकेची यंत्रणा सक्षम असणे अपेक्षित आहेत. महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला मागील वर्षी आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी राहुरी व कोपरगाव येथून बंब बोलवावे लागले होते. महापालिकेच्या अग्निशमन बंबाला कचरा डेपोची आग नियंत्रणात आणता आली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागावर टीका झाली. हा विभाग समक्ष करण्याकडे मात्र प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागात एकूण २७ कर्मचारी आहेत. त्यापैकी ८ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. उर्वरित १९ कर्मचारी अप्रशक्षित आहेत. पाणीपुरवठा, बांधकाम यासह इतर विभागांत बिगारी म्हणून कामावर रुजू झालेल्यांची नियुक्ती अग्निशमन विभागात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठी आग लागल्यास हे कर्मचारी आग नियंत्रणात आणू शकतील का, याबाबत साशंकता आहे.

....

अग्निशमन विभागातील ९६ पदे रिक्त

महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एकूण १२३ पदे मंजूर आहेत. ही पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या विभागातील ९६ पदे रिक्त असल्याने आग विझविताना अडचणी येतात.

....

निधीअभावी नवीन बंबाची खरेदी लांबली

महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन बंब आहेत. हे दोन्ही बंब जुने झालेले आहेत. नवीन एक बंब खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, त्यास मंजुरी मिळाली नाही. जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला; परंतु जिल्हा नियोजनमध्ये नवीन वाहन खरेदीसाठी निधी मिळत नाही. त्यामुळे साहित्य खरेदीसाठी ६० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून साहित्य खरेदी केले जाणार आहे.

...........

- महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी १२३ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या २७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १९ कर्मचारी हे बिगारी असून, उर्वरित ८ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. हे कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून या विभागात कार्यरत असल्याने त्यांना बऱ्यापैकी माहिती झाली आहे.

- शंकर मिसाळ, प्रमुख, अग्निशमन विभाग, महापालिका