शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

‘स्वराज्य’ सिंहगर्जनेचे शतक!

By admin | Updated: May 30, 2016 23:55 IST

योगेश गुंड अहमदनगर :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात

ऐतिहासिक घटना : नगरकरांनी जपल्या स्फूर्तिदायी आठवणीयोगेश गुंडअहमदनगर :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या ऐतिहासिक घटनेची मंगळवारी शतकपूर्ती होत आहे.३१ मे १९१६ रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती. त्यानिमित्ताने अहमदनरचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. ही सभा ज्या ठिकाणी झाली तेथे आज इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी नगरकरांनी त्या ठिकाणी टिळकांचा अर्धपुतळा उभारून व त्याखालील चौथऱ्यावर या ऐतिहासिक घटनेचा तपशील कोरून ती स्फूर्तिदायक आठवण ताजी ठेवली आहे.‘स्वराज्य’ या शब्दाविषयी ब्रिटिश सरकारला चीड असल्यानेच लोकमान्य टिळकांनी स्वराज्य ऐवजी होमरूल (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते. या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी ३१ मे १९१६ रोजी येथील कापड बाजारातील ‘इमारत कंपनी’च्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा घेतली. तेव्हा टिळक युग ऐन भरात असल्याने त्यांच्याविषयी नगरकरांना मोठे आकर्षण होते. त्यामुळे सभेला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. नगरकरांचा अपूर्व उत्साह पाहूनच टिळकांनी या सभेत स्वराज्याची हाक दिली. त्यानंतर हीच घोषणा टिळकांची सिंहगर्जना बनली. १०० वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या या सभेच्या ठिकाणी आज मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र वसाहतीच्या प्रशासनाने टिळकांच्या सभेची स्मृती जतन राहावी म्हणून येथील कापड दुकानाच्या मागील बाजूस लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. त्यामुळे टिळकांच्या आठवणी आजही नगरकरांच्या मनात घर करून आहेत.टिळक हे या सभेसाठी ३१ मे व १ जून असे दोन दिवस नगरमध्ये मुक्कामी होते. नगरच्या आधी त्यांनी बेळगाव येथे सभा घेतली. त्यांच्या होमरूल चळवळीच्या दौऱ्यातील नगर व बेळगावच्या सभा देशभर गाजल्या. नगरची सभा चौकर नामक वकिलांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगरचे भाषण स्वराज्य याच विषयावर केंद्रित होते. होमरूल चळवळीचा त्यांचा दौरा नगरलाच संपल्याचे सांगण्यात येते, कारण नगरच्या सभेनंतर त्यांचे कुठे भाषण झाल्याचा उल्लेख सापडत नाही. नगरच्या सभेनंतर टिळकांचे चार वर्षांनी निधन झाले. --------------------नगरची सभा अन् राष्ट्रद्रोहाचा खटलालोकमान्य टिळकांचे नगरच्या सभेतील भाषण ब्रिटिश सरकारने आक्षेपार्ह असल्याचे ठरवून राष्ट्रद्रोहाखाली त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि २० हजार रुपयांचे दोन जामीन मागितले. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टिळकांनी उच्च न्यायालयात अपील केले. ते मान्य करून न्यायाधीशांनी सरकारचा निर्णय रद्द ठरवला.-----------------